यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, बेळगावात भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 5, 2023

यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, बेळगावात भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

https://ift.tt/Rah3uU9
कोल्हापूर : सौंदत्ती यात्रेसाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. बेळगाव तालुक्यातील रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर जवळ मोठा अपघात झाला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर जवळ भीषण अपघात झाला आहे. यात सहा भाविक ठार झाले आहेत. चार जानेवारीच्या मध्यरात्री हा अपघात झाला असून हे सर्वजण सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात होते. रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावातील हनुमाव्वा म्यागाडी (२५), दीपा (३१), सविता (१७), सुप्रीता (११), मारुती (४२) आणि इंद्रव्वा (२४) अशी मृतांची नावे आहेत. वाहन एका वटवृक्षाला धडकल्याने पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एका भाविकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. घटनेचे वृत्त समजताच बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी रामदुर्ग तालुक्यातील काटकोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री गोविंदा कारजोळ यांनी केली आहे. हेही वाचा :