हाता-तोंडाशी आलेला पोरगा गेला, मुंबई गोवा हायवे अपघातात २५ वर्षीय बाईकस्वाराचा अंत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 16, 2023

हाता-तोंडाशी आलेला पोरगा गेला, मुंबई गोवा हायवे अपघातात २५ वर्षीय बाईकस्वाराचा अंत

https://ift.tt/HpwEU0j
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे झालेल्या अपघातानंतर आता लांजा येथे दुसरा अपघात झाला आहे. या दोन्ही अपघातात दोघा जणांचे जीव गेले आहेत. महामार्गावरील पाली पाथरट उभी धोंड येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या बाईक अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रदीप प्रभाकर धाडवे (वय २५ वर्ष, रा. पाथरट,पाली) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरण कामामुळे रस्त्यावर खड्डे व माती असल्याने अपघात घडत आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्गाचे कंत्राटदार हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे वारंवार अपघात घडत असून अनेक स्थानिक नागरिकांचे बळी जात आहेत. प्रदीप प्रभाकर धाडवे आपल्या कामानिमित्त रत्नागिरी येथे चालला होता. यावेळी झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे झाल्या प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलीस नाईक राकेश तटकरी यांनी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र काही काळानंतर ती सुरळीत करण्यात आली. धाडवे याच्या मृतदेहावर पाली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रदीपचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.हेही वाचा : प्रदीपच्या घरची परिस्थिती बेताची असून किरकोळ मोलमजुरीचा कामधंदा करून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता. या अपघाताची खबर अनिल धाडवे यांनी दिली असून अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्र येथे करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे हे करीत आहेत.हेही वाचा :