WPL 2023: पहिली मॅच देवाला नाही... MI ने जिंकला पहिलाच सामना; कॅप्टनच्या नावावर ऐतिहासिक कामगिरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 5, 2023

WPL 2023: पहिली मॅच देवाला नाही... MI ने जिंकला पहिलाच सामना; कॅप्टनच्या नावावर ऐतिहासिक कामगिरी

https://ift.tt/deSJ2IC
मुंबई: वूमेन्स प्रीमियर लीग २०२३ च्या पहिल्या सिझनला ४ मार्चला सुरुवात झाली आहे आणि पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला गेला. या पहिल्याच सिझनमध्ये ममुंबईच्या संघाने आपली आश्चर्यकारक कामगिरी केली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आहे. या फ्रँचायझीच्या महिला संघाने ही अगदी साजेशी सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात त्याने गुजरात जायंट्सविरुद्ध पाच विकेट्सवर २०७ धावा केल्या होत्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती अर्धशतक ठोकले तिने ३० चेंडूत १४ चौकार लगावत ६५ धावा केल्या. हीली मॅथ्यूजने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार लगावत ४७ धावा केल्या आणि एमिलिया केरने २४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार लगावत ४५ धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांना चपराक दिली आणि सलामीचा सामना संस्मरणीय बनवला. प्रत्युत्तरात गुजरातला अवघ्या ६४ धावांत गुंडाळत सामना १४३ धावांनी जिंकला.हरमनची ऐतिहासिक इनिंग मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरला लिलावात खरेदी केल्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अशा अनुभवी खेळाडूला केवळ १ कोटी ८० लाख मिळाले. तर जेमिमा, ऋचा, स्मृती यांच्यावर अधिक पैशांचा वर्षाव झाल्याची चर्चा होती. पण सिझनमधील पहिल्याच इनिंगने तिने सर्वांना दाखवून दिलं आहे कि ती टीम इंडियाची बेस्ट खेळाडू का आहे. ७ चेंडूत ७ चौकार या सामन्यात हरमनप्रीत कौर फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर उतरली आणि तिने अवघ्या २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सलग सात चेंडूंत सात चौकार मारून तिने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच जिरवली. हरमनने मोनिका पटेलचे शेवटचे चार चेंडू थेट बाऊंड्री लाईनजवळ पाठवले आणि त्यानंतर पुढच्याच षटकासाठी दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर आल्यावर अॅश्ले गार्डनरलाही सलग तीन चौकार ठोकले.अर्धशतक ठोकणारी पहिली खेळाडू मुंबईत झालेल्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या तिसऱ्या षटकात यास्तिका भाटियाच्या रूपाने तिला पहिले यश मिळाले, परंतु दुसरी सलामीवीर हीली मॅथ्यूजने आक्रमण सुरूच ठेवले आणि नॅट सिव्हर ब्रंटसोबत दुस-या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचून या दोघीनी संघाला एक चांगली धावसंख्या उभारून देण्यात सुरुवात केली. या दोघीही बाद झाल्यानंतर हरमनप्रीत आणि एमिलिया यांनी ४२ चेंडूत ८९ धावांची जलद खेळी करत मुंबईला मोठ्या धावसंख्येकडे नेले.टी-२० विश्वचषकानंतरची हरमन गेल्या महिन्यात झालेल्या टी-२० महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवाचे दु:ख आजही प्रत्येक भारतीयाला खदखदत आहे. त्यानंतर चांगली फलंदाजी करणारी हरमनकडून सर्वांनाच आशा होती, पण दुर्दैवाने ती धावबाद झाली. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर, हरमन चष्मा घालून प्रेझेंटेशनसाठी आली जेणेकरून देशाने तिच्या डोळ्यातील अश्रू पाहू नयेत. आज तिने या खेळीत जणू तो सगळा राग काढला आणि शानदार खेळ खेळत ऐतिहासिक खेळी केली.