विरोधकांचा सुपडासाफ करण्याचा निर्धार, ४८ जागा जिंकणार; महायुतीच्या नेत्यांचा एल्गार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 2, 2023

विरोधकांचा सुपडासाफ करण्याचा निर्धार, ४८ जागा जिंकणार; महायुतीच्या नेत्यांचा एल्गार

https://ift.tt/GzSs7xi
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: 'सध्या हयात हॉटेलमध्ये जमलेले नेते दमलेले आहेत. मोदींनी त्यांना दमवले आणि थकवले. ते आता जागा शोधत आहेत,' अशी टीका मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी वरळी येथे महायुतीच्या सभेत 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांवर केली. या सभेमध्ये लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागां जिंकण्याचा संकल्प करण्यात आला.उपमुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकारी या सभेला हजर होते.'इंडिया' आघाडीची बैठक आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, 'जगातील प्रमुख देशातील नेते मोदींना जागतिक नेते म्हणून गौरव करतात. सध्या हयात हॉटेलमध्ये जमलेले नेते दमलेले आहेत. मोदींनी त्यांना दमवले आणि थकवले. सन २०१४, २०१९ला त्यांना गायब केले. ते आता जागा शोधत आहेत. ४०० जागा जिंकणारे ४०वर आले. आघाडी गॅसवर आहे. मोदी यांच्यापर्यंत विषय गेल्यामुळे त्यांनी २०० रुपयांनी गॅस कमी केला.इंडिया आघाडीच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी रागाने बैठक अर्धवट सोडून पुन्हा पश्चिम बंगालकडे रवाना झाल्याची चर्चा आहे. त्या संदर्भात फडणवीस म्हणाले, 'येथे कुणालाच प्रश्न पडला नाही की आमची जाग नेमकी कुठे आहे. पण विरोधकांच्या बैठकीत ममता दीदी आल्या, त्यांना बसायला खुर्ची न दिल्याने त्या रागाने निघून गेल्या. त्यांना शरद पवारांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत.'या सभेत अजित पवार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. 'नीती आयोगाच्या बैठकीवरून काही जण राजकारण करीत असून, त्यांना विकासाबद्दल बोलायचे नाही. नीती आयोगाने निवडलेल्या चार शहरांत असून, मुंबईचा समावेश आहे. मात्र, मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काही जण राजकारण करीत आहेत. मात्र, चंद्र-सूर्य आहेत, असेपर्यंत कुणाचा बापही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही,' असे पवार म्हणाले.मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची योजना झाली, असे उद्धव ठाकरे नेहमी बोलतात, मात्र मुंबई कुणी तोडू शकत नाही. याआधी मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला, पण आता कोणी बाहेर जाणार नाही.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीआजच्या महायुतीच्या सभेतील 'मिशन ४८' चा संकल्प पूर्ण करूया. महाराष्ट्राच्या भल्याकरिता उत्तम पद्धतीने काम करू या.अजित पवार, उपमुख्यमंत्री