
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळेल आणि आपला मुलगा नगरसेवक, आमदार नव्हे तर थेट खासदार होईल, असे पक्षविरोधी विधान केल्याप्रकरणी खासदार यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी आमदार आणि शिंदे गटाचे उपनेते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. शिशिर शिंदे यांच्या या मागणीमुळे लोकसभा निवडणूक निकालाआधीच शिंदे गटात धुसफूस सुरु झाल्याचे चित्र एकीकडे समोर आले असताना दुसरीकडे यांना बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकर यांचा कट असल्याचा आरोप भाजप नेते यांनी केला आहे.ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलेल्या गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचे सांगत महायुतीच्या पराभवाचे संकेत दिले. कीर्तिकर यांच्या विधानाने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नीने पक्षविरोधी वक्तव्य करून विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली आहे. त्यामुळे ‘मातोश्रीचे लाचारश्री’ होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी शिशिर शिंदे यांनी पत्रात केली आहे.गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करीत होते. तसेच, गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदारनिधी अमोल कीर्तिकर यांनी स्वत:च्या प्रचारासाठी आणि विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्यांचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र, फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करीत ठाकरे गटाची बाजू घेतली. गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करीत आहेत. त्यामुळे आता त्यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा, असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.