Nashik Weather Update: नाशिकला उष्णतेचा 'यलो अलर्ट'; २५ मेपर्यंत इशारा, आज कसं असेल हवामान? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 23, 2024

Nashik Weather Update: नाशिकला उष्णतेचा 'यलो अलर्ट'; २५ मेपर्यंत इशारा, आज कसं असेल हवामान?

https://ift.tt/Xmiyg1Q
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात सलग चार दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी उष्ण वाऱ्याचा वेग अधिक राहणार असून, तापमान ४२ अंशांवर स्थिर राहण्याची शक्यता आहे.आठ दिवसांपासून दमटपणासह उकाड्यात वाढ होत आहे. नाशिकसह जळगाव, धुळे, मालेगाव या उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. बुधवारी (दि.२२) २६.८ किमान, तर ४२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारी साडेतीननंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. परंतु, आर्द्रता ५८ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने उष्णतेचा चटका जाणवला. त्याचवेळी मालेगावात ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. नाशिकमध्ये पहिल्यांदाच तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत उकाड्यामुळे चक्कर येणे, शरीरातील पाणी कमी होणे या स्वरूपाच्या व्याधी उद्भवत आहेत. त्यामुळे अधिक पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, अतिउकाड्यामुळे सकाळी साडेअकरापासून रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.काय आहे कारण?- महाराष्ट्र व गुजरात राज्यात चक्रवातस्थिती निर्माण झाल्याने वायव्य दिशेकडून उष्ण वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम उत्तर व मध्यम महाराष्ट्रात होत आहे.- अंदमानात मान्सून दाखल झाल्याने पूर्व मान्सून स्थिती दक्षिण व मध्य भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होत असून, आर्द्रतादेखील वाढली आहे. दमटपणामुळे उकाडा आणखी जाणवत आहे.- पुढील दोन दिवस तापमान वाढ कायम राहील. मे महिन्याच्या अखेरीस तापमानात हळूहळू घट होत पूर्वमान्सून सरी बरसतील असा हवामान विभागाचा अंदाज धुळे, नंदुरबारही तापलेधुळे : धुळे व नंदुरबार शहरासह परिसरात दोन दिवसांपासून ४२ अंशांवर असलेले तापमान थेट ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जळगावकरांवर सूर्य कोपलाजळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील चार दिवसांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. जळगावात बुधवारी (दि.२२) ४५.३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील हे उच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळाली. जळगावातील ममुराबाद येथील हवामान विभागाच्या तापमापकावर ही नोंद करण्यात आली.