
राज्यभरात 10 हजार 720 अपघात झाले आहेत. अपघातात सर्वाधिक घटना मुंबईत पण अपघातातील सर्वाधिक मृत्यू पुणे ग्रामीण येथे झाले आहेत. मुंबईत नऊ महिन्यात 1 हजार 878 अपघात झाले आणि 262 मृत्यू नोंदविले गेले, तर पुणे ग्रामीण भागात झालेल्या अपघातात 764 जणांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातात देखील 16 टक्के वाढ झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर 29 टक्के घट झाली आहे. तर नवले पूल येथे देखील अपघातांची संख्या वाढली आहे. नवले पूल परिसरात प्रति तास वेगमर्यादा 30 किलोमीटर होणार. नवले पूल अपघातानंतर जड वाहनांना आणि इतर वाहनांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर स्पीड गण लावून जागेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर, धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला. धुळे शहराचे तापमान आठ अंशाच्या ही खाली. तापमानात मोठी घट झाल्याने थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.