Maharashtra Weather Update : या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस, थेट 24 तासात.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 12, 2026

Maharashtra Weather Update : या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस, थेट 24 तासात..

Maharashtra Weather Update : या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस, थेट 24 तासात..

राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून मोठा बदल होत आहे. मागील आठवड्यात मुसळधार पाऊस सर्वत्र होता. आता पाऊस कमी अधिक कोसळताना दिसत आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे. धुळे, रत्नागिरी, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या भागात पाऊस हजेरी लावेल. सोमवारी विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल. मराठवाड्यातही काही भागात पाऊस कोसळेल. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा श्रीनगर, शाहजहानपूर, रोहतक, मुझफ्फरपूर, बस्ती येथे सक्रिय आहे. वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे 5.8 किलोमीटर उंचीवर आहे. तेलंगणापासून कर्नाटकपर्यंत पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत 3.1 किमोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्यात विश्रांतीनंतर धो धो पावसाला सुरूवात होईल. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनच्या पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात थेट अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व आणि मध्य भारतात अतिमुसळधार पाऊस अनेक भागात झाला.

पर्वतीय प्रदेशात भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, यादरम्यानच नागरिकांना मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. पूर्व आणि मध्य भारतात आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाने तिकडे चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे. प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. लवकरच अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचा अंदाज आहे.

एल निनोचा प्रभाव मॉन्सूनच्या पावसावर असण्याचा अंदाज होता. ज्यामुळे एक तर कमी पाऊस किंवा अति पाऊस पडण्याचा अंदाज होता. त्यामध्येच एल निनोचा प्रभाव असूनही भारतात चांगल्या मॉन्सूनचा पाऊस कोसळताना दिसत आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. आता अजून पावसाची अपेक्षा आहे. दोन ते तीन दिवसात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे. यंदा राज्यात मॉन्सून उशीराने दाखल झाला.