लातूर: महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात दिग्गज उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत सुरू असताना मतदारसंघामध्ये मात्र वेगळंच चित्र आहे. या मतदारसंघात तब्बल ७ हजार ६१९ मतदारांनी 'नोटा'चं बटण दाबलं आहे. विशेष म्हणजे, ही दुसऱ्या क्रमांकाची मते आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या समोर शिवसेनेचे सचिन देशमुख यांचं आव्हान होतं. तर, अर्जुन वाघमारे हे अपक्ष म्हणून लढले होते. मात्र, सुरुवातीपासूनच या मतदारसंघात धीरज यांची हवा होती. त्यांचे धाकटे बंधू अभिनेते रितेश देशमुख यांनी त्यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. त्याचं प्रतिबिंब निकालात पडलेलं दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार धीरज देशमुख हे आघाडीवर आहेत. त्यांना २७ हजार ७६३ मते मिळाली आहेत. तर, त्यांच्या पाठोपाठ 'नोटा'ला ७ हजार ६१९ मते मिळाली आहेत.
https://ift.tt/2JeRVVC