रोहित पवारांनी दिले नव्या समीकरणांचे संकेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 24, 2019

रोहित पवारांनी दिले नव्या समीकरणांचे संकेत

https://ift.tt/32ICf4N
अहमदनगर: 'महाराष्ट्राच्या नावात 'महा' हा शब्द आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्या नावाला साजेसं राज्यात काही घडलेलं नाही. हे चित्र बदलायचं असेल आणि त्यासाठी एखादं नवं समीकरण पुढं येत असेल तर त्याला माझा पाठिंबाच असेल,' असं सूचक वक्तव्य मतदारसंघातून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस असं काही नवं राजकीय समीकरण उदयास येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू यांनी पुण्याबाहेर जाऊन विधानसभा निवडणूक लढविली होती. भाजपचे तरुण तडफदार मंत्री व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू प्रा. राम शिंदे यांना आव्हान दिले होते. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची झाली. या लढतीत सध्या तरी रोहित यांनी बाजी मारल्याचं दिसत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत रोहित यांनी राम शिंदे यांच्यावर आघाडी घेतली आहे. त्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'कर्जत-जामखेडमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला बाहेरचं पार्सल म्हणून हिणवलं गेलं. मात्र, त्याकडं दुर्लक्ष करत आम्ही महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलत होतो. गटातटाचं राजकारण बाजूला सारून विकासासाठी एकत्र येण्याचं आवाहन आम्ही केलं. त्याला लोकांनी प्रतिसाद दिल्याचं दिसतंय,' असं रोहित पवार म्हणाले. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे धोरण अवलंबलेल्या भाजपला राज्यांतील सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयोग यापूर्वी अनेक राज्यांमध्ये झाले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलानं ऐनवेळी एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवले होते. उत्तर प्रदेशात कट्टर राजकीय वैरी असलेल्या समाजवादी व बहुजन समाज पक्षानं एकत्र येऊन निवडणूक लढली होती. तर, बिहारमध्ये लालू आणि नितीशकुमार यांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवले होते. असाच काही प्रयोग महाराष्ट्रात होणार का याबाबत उत्सुकता आहे.