
नवी दिल्ली: भारतीय हवाईदलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी यांच्या करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी या दिवशी पाकिस्तानचे एफ-१६ हे लढावू विमान पाडल्यानंतर ५१ स्क्वाड्रन प्रशस्तीपत्र देण्यात आले. कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हे ५१ क्वाड्रनचा हा सन्मान स्वीकारणार आहेत. या व्यतिरिक्त बालाकोट एअरस्ट्राइक यशस्वीपणे राबवणाऱ्या ९ क्वाड्रनचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. याच क्वाड्रनच्या मिराज २००० या लढावू विमानांनी 'ऑपरेशन बंदर' यशस्वी केले होते. ९ क्वाड्रनला देखील यूनिट प्रशस्तीपत्र देण्यात आले होते. बालाकोट एअरस्ट्राइक आणि पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना परतवून लावणारी क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवालच्या ६०२ सिग्नल यूनिटचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. पुलवाम्यामध्ये १४ फेब्रुवारी या दिवशी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. याच हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने बालाकोट हवाई हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे लढावू विमान खाली पाडले. याच दरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे लढावू विमानही कोसळले होते. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे लढावू विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यानंतर पाकमध्ये त्यांना कैद करण्यात आले. त्यांच्या सुटकेसाठी भारताने मोठे प्रयत्न केले. अभिनंदन यांना पाकिस्तानने दोन दिवस कैदेत ठेवले होते. भारताच्या प्रयत्नांनंतर १ मार्च या दिवशी पाकिस्तान सरकारने अभिनंदन वर्तमान यांची सुटका केली. २७ फेब्रुवारी या दिवशी अभिनंदन यांनी केलेल्या कामगिरीचा सन्मान करत भारत सरकारने त्यांना वीर चक्र जाहीर करत त्यांचा सन्मान केला. परमवीर चक्र, महावीर चक्र यांनंतर वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार समजला जातो. आज विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या क्वाड्रनचा वायुदलातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.