बँकांमध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

बँकांमध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा?

https://ift.tt/33RyhH0
नवी दिल्ली: बँकांमधील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. लवकरच बँकांमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळं आठवड्यातील पाच दिवसच त्यांना काम करावं लागणार आहे. दर शनिवार आणि रविवारी बँका बंद असतील. सध्या दर रविवार आणि दुसरा-चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. याशिवाय बँक कर्मचाऱ्यांच्या 'फॅमिली पेन्शन'मध्येही वाढ होईल, तसंच पगारात १५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचे मान्य केले आहे. महिनाभरात बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात आमच्याशी चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावावेत, असे निर्देशही मंत्रालयाने इंडियन बँक्स असोसिएशनला (आयबीए) दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बँक संघटनांसमवेत आयबीएची एक बैठक होणार आहे. लवकरच बैठकीची तारीख घोषित करण्यात येईल. या बैठकीत मान्य केल्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत पाच दिवसांचा आठवडा आणि फॅमिली पेन्शन, वेतनवाढ आदींबाबत घोषणा करण्यात येईल. २०१७ पासून बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवण्यात आली. काही तांत्रिक बाबी आहेत, त्या अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करणे गरजेच्या आहेत. अर्थ मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी त्यानंतर सहमतीवर दोघांकडून स्वाक्षरी करण्यात येईल, हा मुद्दाही बैठकीत मान्य करण्यात आला. बँक कर्मचाऱ्याच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या मागण्या २०१७पासून प्रलंबित आहेत. त्यावर लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असं ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन जनरल सेक्रेटरी सौम्या दत्ता यांनी सांगितलं. पगार वाढणार? पाच दिवसांचा आठवडा आणि पगारात २५ टक्क्यांची वाढ या बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. २५ टक्के होण्याची शक्यता खूप कमी असल्याचं बँक संघटनांनाही वाटतं. त्यामुळं पंधरा टक्के वेतनवाढीवर सहमती होण्याची शक्यता आहे. एका बँक संघटनेच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या मागण्या २०१७ पासून प्रलंबित आहेत. वेतनवाढीच्या मागणीवर समझोता होऊ शकतो असं बँक कर्मचाऱ्यांना वाटतं. हे प्रकरण अधिक ताणलं गेलं तर कर्मचाऱ्यांचे नुकसान होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.