
मुंबई: राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राबरोबरच हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठीही मतदानाला सुरुवात झाली आहे. या व्यतिरिक्त देशातील विविध राज्यांमधील ५१ जागांवर पोटनिवणूकही होत आहे. लोकसभा निवडणुकीत बंपर विजय खचून घेणाऱ्या आणि सहकारी पक्ष शिवसेना राज्यात सत्ता येईल असा पूर्ण विश्वास आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विधानसभेतही मोठा विजय प्राप्त करण्याचे भाजपपुढे आव्हान उभे राहिले आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भारतीय जनता पक्ष हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्याच्या प्रयत्नात आहे. विरोधी पक्ष प्रचारादरम्यान निरुत्साही वाटत असले, तरी देखील सरकारविरोधी लाटेचा (अँटी इनकम्बन्सी) आपल्यासाठी चांगला परिणाम होईल अशी आशा विरोधकांना आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेने आपल्यातील मतभेद दूर करून शेवटी युती करत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे महाआघाडीचे प्रमुख पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष निवडणूक प्रचारादरम्यान कमकुवत असल्याचेच स्पष्ट झाले. मात्र, या दरम्यान महाआघाडीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. लोकसभा निवडणुकीत हरयाणात भाजपने केले होते क्लिन स्वीप महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी भाजप-शिवसेना युतीने तब्बल ४१ जागा जिंकल्या होत्या. त्याच प्रमाणे हरयाणात लोकसभेच्या एकूण १० जागा आहेत. यात भारतीय जनता पक्षाने सर्व जागा जिंकल्या होत्या. यानंतर विधानसभा निवडणुकीत युतीचे पारडे जड असल्याचेच मानले जात आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी २४ ऑक्टोबरला होणार आहे. भाजपला हरयणात लोकसभेला मिळालेल्या अभूतपूर्व यशाची या निवडणुकीत पुनरावृत्ती होणार का, हा राज्यात चर्चेचा विषय आहे. कलम ३७० वर आक्रमक झाला भाजप निवडणूक प्रचाराचा विचार करता भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. या दरम्यान भारतीय जनता पक्षाने कलम ३७० हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला होता. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची विशेष अशी प्रचाराची रणनीती दिसली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान केंद्र आणि राज्यांमधील भाजपच्या सरकारांवर टीकेची झोड उठवलेली पाहायाला मिळाली. या निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या मोठ्या भावाच्या जागी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष एकूण १६४ जागा लढवत आहे. तर शिवसेना एकूण १२६ जागांवर निवडणूक लढवत आहे. भारतीय जनता पक्षाचे सबहकारी पक्ष हे भारतीय जनता पक्षाच्याच निवडणूक चिन्हावर ही निवडणूक लढत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेस १४७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२१ जागा लढत आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकूण १०१ जागा लढवत आहे. तर, डाव्या पक्षांपैकी सीपीआयचे १६ तर सीपीएमचे ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. हरयाणात काँग्रेसने बदलला अध्यक्ष, भाजपने वाढवले टार्गेट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरयाणा काँग्रेसने आपला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे काम केले आहे. तर मुख्यमंत्री खट्टर यांच्या नेतृत्त्वात भाजपने ९० पैकी एकूण ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या विधानसभेत भाजपचे एकूण ४८ आमदार आहेत.