मी मॅच जिंकलीय, धावसंख्याही ठरलीय: उद्धव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 11, 2019

मी मॅच जिंकलीय, धावसंख्याही ठरलीय: उद्धव

https://ift.tt/2VxMQN7
अमरावती: 'आम्ही बंद हॉलमधली माणसं नाही. उघड्या मैदानात लढणारी माणसं आहोत. बोलतो, पाहतो, करतो असं बोलणारी शिवसेना नाही. जे बोलतो ते करतो, अशी उद्धव आणि आदित्यची शिवसेना आहे,' असं सांगतानाच, 'मी मॅच जिंकलेली आहे. माझी धावसंख्याही ठरलेली आहे,' असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी आज बोलून दाखवला. विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 'ही निवडणूक म्हणजे अन्यायाविरुद्धचे, धनदांडग्यांविरुद्धचे बंड आहे. बंड हे असलेच पाहिजे. अमरावती स्वाभिमानी आहे. इथं पैसा चालणार नाही. पैशांच्या विरोधात, दलालीच्या विरोधात आपल्याला बंड करायचे आहे. मागील वेळेस जरा गडबड झाली. संपूर्ण देशामध्ये भगवा असताना अमरावतीमध्ये भगवा नाही, याची मला खंत आहे. पण आता अमरावतीमध्ये युतीचे आठही आमदार निवडून आले पाहिजेत. भगव्याचे मावळे विकले जात नाहीत, हे दाखवून द्या, असं आवाहन उद्धव यांनी अमरावतीकरांना केलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे: >> राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षातून युतीमध्ये आले कारण ते काम करण्यासाठी राजकारणात आले आहेत >> जनतेतलाच माणूस जनतेचे नेतृत्व करतो त्याला प्रतिनिधी म्हणतात >> पैशांच्या विरोधात, दलाली विरोधात बंड करायचे आहे >> १० रुपयाचे शिवभोजन देणार >> रुपयांमध्ये गरीबांना प्राथमिक आरोग्य चाचण्या करून देणार >> शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करणार. 'कर्जमाफी' हा शब्द मला पटत नाही >> जी वचने तुम्हाला दिलेली आहेत, ती पूर्ण करण्यास मी बांधिल आहे >> निवडणुकीनंतर मी पुन्हा अमरावतीमध्ये येणार आणि ही वचने पूर्ण करणार महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. असा आहे निवडणूक कार्यक्रम २७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना ४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत ५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत २१ ऑक्टोबर : मतदान २४ ऑक्टोबर : मतमोजणी