टी-२० : दीपक चहरची 'या' विक्रमांना गवसणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 11, 2019

टी-२० : दीपक चहरची 'या' विक्रमांना गवसणी

https://ift.tt/32BQMOS
नागपूर: बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या लढतीत भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यानं हॅट्ट्रिक केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याशिवाय चहरनं टी-२० क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. चहरनं डावाच्या १८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शफीउल इस्लाम याला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. स्लो बाऊंसरवर त्यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं टोलवलेला चेंडू लाँग ऑनवर उभ्या असलेल्या लोकेशच्या हातात जाऊन विसावला. डावाचे अखेरचं षटकही त्यानं टाकलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुस्तफिजुर रहमान याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. त्यानंतर अमिनुल इस्लामला त्रिफळाचित केलं. याचबरोबर त्यानं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला. सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचा विक्रम दीपक चहरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ गोलंदाजी केली. त्यानं ३.२ षटकांत अवघ्या ७ धावा दिल्या आणि सहा विकेट घेतल्या. ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा अजंता मेंडिस यांच्या नावावर होता. त्यानं २०१२ मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध ८ धावा देऊन सहा विकेट घेतल्या होत्या. वाचा: भारताकडून सातवी हॅट्ट्रिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून ही सातवी हॅट्ट्रिक आहे. कसोटीमध्ये भारताकडून हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी हॅट्ट्रिक घेतली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेतन शर्मा, कपिल देव, कुलदीप यादव आणि मोहमद शमी यांनी हा कारनामा केला आहे. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चहर यानं हॅट्ट्रिक घेतली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. महत्वाचे... >> आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्‌‌ट्रिक नोंदवणारा हा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला. >> टी-२० क्रिकेटमध्ये लोकेश राहुलने सहावे अर्धशतक झळकावले. तसेच, विदर्भ क्रिकेट स्टेडियममधील लोकेश राहुलचे हे आंतरराष्ट्रीय टी-२०मधील दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी, या स्टेडियममध्ये राहुलने इंग्लंडविरुद्ध ७१ धावांची खेळी केली होती. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२०मध्ये १७०हून अधिक धावा केल्या. यापूर्वी, या स्टेडियमवर २००९मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध ९ बाद १८६ धावा केल्या होत्या.