भाजपच्या अहंकारामुळेच जनादेशाचा अपमान: राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 11, 2019

भाजपच्या अहंकारामुळेच जनादेशाचा अपमान: राऊत

https://ift.tt/2WYQssi
मुंबई: राज्यातील जनतेने सत्तेसाठी जनादेश दिला असतानाही, आम्ही विरोधी पक्षात बसू पण मित्रपक्षाशी चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतल्याने भारतीय जनता पक्षाच्या अहंकाराने जनादेशाचा अपमान केला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ता आणि खासदार यांनी भारतीय जनता पक्षावर पलटवार केला आहे. राज्यपालांनी १०५ जागा असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी ४८ तास दिले असताना शिवसेनेला मात्र २४ तासांचीच वेळ दिली, असे म्हणत राज्यपालांनी आम्हाला अधिक वेळ देण्याची गरज होती असेही राऊत म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी आम्हाला अधिक वेळ देण्याची गरज होती असे सांगताना काही लोकांना राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन आपण दोन्ही पक्षांना करत असल्याचे राऊत म्हणाले. भाजपने शिवसेनेवर खापर फोडू नये राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असताना युतीची सत्ता राज्यात स्थापन न होण्याबाबत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर खापर फोडू नये असे राऊत म्हणाले. ही स्थिती भारतीय जनता पक्षाच्या अहंकारामुळे निर्माण झाली असल्याचे म्हणत राऊत यांनी या परिस्थितीसाठी भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शिवेसेनेविरुद्ध मोठे षडयंत्र रचले गेले असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरच केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.