मुंबई: 'मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनेचं सूर्ययान उतरवण्याचं आमचं मिशन यशस्वी झालं आहे. माझी जबाबदारी आता कमी झाली आहे. उद्यापासून मी मीडियाशी फारसं बोलणार नाही,' असं शिवसेनेचे खासदार यांनी सांगितलं. भाजप-शिवसेना युतीतील वाद चिघळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याशी सातत्यानं संवाद साधून नवी सत्तासमीकरणं जुळवण्यात संजय राऊत यांचा मोलाचा वाटा होता. अस्तित्वात येऊ नये म्हणून भाजप करत असलेल्या राजकारणावर राऊत हे रोजच्या रोज प्रहार करत होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे ठामपणे सांगत होते. भाजपकडून त्यांना व्हिलनही ठरवण्यात आलं होतं. हे प्रयत्न फळाला आल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रसन्न मूडमध्ये असलेल्या राऊत यांनी महाराष्ट्राचं पुढचं सूर्ययान दिल्लीत उतरेल, असा विश्वास व्यक्त केला. 'महाराष्ट्राचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरेल असं मी म्हणालो होतो. तेव्हा लोक माझी चेष्टा करत होते. पण आमचा पक्ष आणि आम्ही काय करतोय हे आमचं पक्कं माहीत होतं,' असं ते म्हणाले. महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचं सरकार येतंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लवकरच शपथविधी होतील. त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर ते बोलतील. आमचं मिशन पूर्ण झालेलं आहे. आता आपलं काम संपलं आहे, असं खुदद् शरद पवारच मला म्हणाल्याचं राऊत यांनी सांगितलं. आपण शिवसेनेचे चाणक्य आहात का असं विचारलं असता, 'आम्ही चाणक्य वगैरे नाही. चाणक्य ही खूप मोठी व्यक्ती होती. आम्ही लढणारे आहोत. परिणामांची पर्वा न करता लढणारे शिवसैनिक आहोत,' असं त्यांनी स्पष्ट केलं. दिल्लीच्या तख्तापुढं महाराष्ट्र झुकणार नाही. तुटणार नाही, असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिला. भाजपनं पवारांचा इतिहास चाळून पाहावा! संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकाकर शरद पवार यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं. शरद पवार समजून घ्यायला १०० जन्म घ्यावे लागतील असं मी उगाच म्हणालो नव्हतो. भाजपनं शरद पवारांचा इतिहास चाळून पाहायला हवा,' असा टोलाही त्यांनी हाणला.