मांस खाऊन मुलं नरभक्षक होऊ शकतात: भाजप नेता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 1, 2019

मांस खाऊन मुलं नरभक्षक होऊ शकतात: भाजप नेता

https://ift.tt/3264Cc3
भोपाळ: मध्य प्रदेशच्या शाळांमधील माध्यान्ह भोजनात अंडी देण्याच्या निर्णयाला भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांना विरोध दर्शवला आहे. मुलांना मांसाहारी पदार्थ दिले गेल्यास ती नरभक्षक बनू शकतात. तसंच, यामुळं धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असं तर्कट या नेत्यानं मांडलं आहे. असं या महाशयांचं नाव आहे. माध्यान्ह भोजनात अंडी सुरू करण्यावरून सध्या सत्ताधारी व भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. भार्गव हे यात आघाडीवर असून त्यांनी सरकारवर तोफ डागली आहे. 'एका कुपोषित सरकारकडून आणखी कोणती अपेक्षा केली जाऊ शकते?. या सरकारनं अंडी देण्याचा निर्णय घेतलाय. जे खात नाहीत, त्यांनाही बळजबरीनं खायला लावलं जाईल. ही अंडी खाऊनही मुलं कुपोषित राहिल्यास भविष्यात त्यांना चिकन आणि बकऱ्याचं मटणही दिलं जाऊ शकतं. मात्र, भारतीय संस्कृतीमध्ये मांसाहार निषिद्ध मानला गेला आहे. आपण मुलांना मांसाहार करायला शिकवला तर मांस खाऊन ते नरभक्षी होऊ शकतात, अशी भीती भार्गव यांनी व्यक्त केली आहे. 'कमलनाथ यांचं सरकार लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू शकत नाही. कोणालाही अंडी खाण्यासाठी बळजबरी केली जाऊ नये,' असा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्री इमरती देवी यांनी नोव्हेंबरपासून शाळेतील मुलांना माध्यान्ह भोजनात अंडी देण्यास सुरुवात केली जाईल. कुपोषणाशी लढण्यासाठी त्याचा फायदा होईल,' अशी घोषणा केली होती. तेव्हापासून वादाला सुरुवात झाली आहे. याआधी छत्तीसगड सरकारने देखील शाळांमध्ये अंडी पुरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विरोधकांच्या आक्षेपानंतर तो मागे घेण्यात आला. त्याऐवजी आवश्यक त्यांना होम डिलिव्हरी करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.