हा तर भाजपचा दुर्योधनी कावा; उद्धव ठाकरे यांचा घणाघात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 13, 2019

हा तर भाजपचा दुर्योधनी कावा; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

https://ift.tt/33LSNJu
मुंबई: सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके .या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधल आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात भारतीय जनता पक्षावर टीकेचे प्रहार केले आहेत. राज्यात लागल्याचा निषेध करत राष्ट्रपती राजवटीची शिफारस म्हणजे महाराष्ट्रात घोडेबाजाराला सुरुवात झाली नसली तरी त्या दिशेने पडलेले ते पाऊल असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. विशेष म्हणजे सामनाचे कार्यकारी संपादक यांच्यावर लीलावती रुग्णालयात एंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुया टोचलेल्या हातांनी हा अग्रलेख लिहीत आपण 'मॅन इन अॅक्शन' असल्याचे स्पष्ट केले आहे. राऊत यांनी अग्रलेखाद्वारे शिवसेनेची भूमिका लिहितानाचा हॉस्पिटलमधील फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपचा हा दुर्योधनी कावा भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती राजवटीचे खापर शिवसेनेवर फोडले असले, तरी देखील राष्ट्रपती राजवटीला भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. ठरल्याप्रमाणे भाजप आपल्या शब्दाला जागला असता कर परिस्थिती इतक्या थराला गेली नसती. शिवसेनेला जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकड्यांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा असल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही आणि राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसक बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे, असा टोलाही अग्रलेखात लगावण्यात आला आहे. भाजपची विकृती महाराष्ट्राच्या मुळावर आली शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र पाठिंब्याची पत्रे वेळेत पोहोचू शकली नाहीत. याचा अर्थ १०५ वाल्यांनी जल्लोष करावा असा होत नाही, असे सांगताना माझा मळवट मीच पुसला, पण दुसऱ्या सौभाग्याचे वाईट झाले याचा आनंद मानणाऱ्यांची ही विकृतीच महाराष्ट्राच्या मुळावर आली असल्याचा आरोप भाजपवर अग्रलेखात करण्यात आला आहे. 'यंत्रणेचा गैरवापर, मनमानी म्हणायची ती यालाच' भारतीय जनता पक्षासोबतचे कटू अनुभव आम्ही गेली अनेक वर्षे घेत असल्याचे सांगत २४ तारखेपासून सत्तास्थापनेची संधी असतानाही भारतीय जनता पक्षाने हालचाली केल्या नाहीत. भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्याला १५ दिवस सहज मिळाले आणि शिवेसनेला मात्र धड २४ तासही मिळाले नाहीत हे कसले कायदे असा प्रश्नही अग्रलेखात उपस्थित करण्यात आला. म्हणे राज्याबाहेर असलेल्या आमदारांच्या सह्या जमवून आणा, ते देखील २४ तासांत. यंत्रणेचा गैरवापर, मनमानी म्हणायती ती यालाच. कोणतेही दोन किंवा तीन पक्षांचे सूत जमल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, हे माहीत असतानाही राजभवनातून २४ तासांची मुदत मिळते आणि त्यानंतर १०५ वाल्यांकडून जो आनंदी आनंद साजरा केल्याची दृश्ये दाखवली जातात हे काही चांगले लक्षण नसल्याचे सांगत, दिलेल्या शब्दास जागल्याचा आनंद मानावा, की महाराष्ट्र अस्थिरतेच्या खाईत ढकलल्याचा आनंद मानावा हे ज्याचे त्याला ठरवू द्या अशा शब्दांत भाजपला टोला हाणण्यात आला आहे.