'तुझ्यात जीव रंगला'चे १००० भाग पूर्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 3, 2019

'तुझ्यात जीव रंगला'चे १००० भाग पूर्ण

https://ift.tt/2Ybt2R9
कोल्हापूर: '' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा होती. मात्र राणा दा आणि अजंली बाई यांच्या या मालिकेनं नुकताच १००० भागांचा टप्पा पार केलाय. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले आहेत. त्यामुळं मालिका संपणार हे समजताच अनेकांचा हिरमोड झाला होता. मालिकेनं १००० भागांचा टप्पा पार केल्यानं चाहत्यांमध्ये देखील मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. एखाद्या मालिकेनं महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर केक कापून सेलिब्रेशन केलं जातं. परंतू 'तुझ्यात जीव रंगला' च्या टीमनं मात्र अगदी वेगळ्या पद्धतीनं ही १००० भागांचा आनंद साजरा केला. याचं सेलिब्रेशन सेटवर केक कापून न करता जरा वेगळ्या पद्धतीनं केलं गेलं. हा आनंदाचा क्षण सेटवर पूजा करून साजरा करण्यात आला. यादरम्यान, मालिकेतील सर्व कलाकार मंडळी आनंदी असल्याचं पाहायला मिळालं. सर्वांनीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. 'प्रेक्षकांच्या प्रेमामुळं मालिकेनं हजार भाग पूर्ण केले. यामध्ये या वास्तूचाही मोठा वाटा आहे. वास्तूनं आम्हाला साडेतीन वर्षं साथ दिली. त्यामुळं या वास्तूचे आभार म्हणून नवीन एपिसोडची सुरुवात करण्यासाठी आम्ही पूजा केली', असं मालिकेतल्या पाठक बाई, म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर म्हणाली. 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका अल्पावधीतच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरली. राणादा आणि पाठक बाई यांची आगळी-वेगळी लव्हस्टोरी सगळ्यांनाच आवडली. २०१६मध्ये सुरू झालेली ही मालिका अजूनही टीआरपीच्या शर्यतीत टिकून आहे. राणादा आणि पाठक बाई यांच्याबरोबरच वहिनीसाहेब, छोट लाडू, सन्नी दा, चंदा यांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिकेत सध्या सर्व गावात आणि घरात वहिनीसाहेबांचीच सत्ता आहे, असं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर आता नंदिता गायकवाड म्हणजेच धनश्री काडगावकर हिनं मालिकेचा निरोप घेतला.नंदितानं मालिकेत आत्तापर्यंतच्या रचलेल्या कट-कारस्थानांची कबुली दिलेय. यावरूनच आरोप सिद्ध होऊन तिला शिक्षा झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. धनश्रीनं जरी मालिकेतून एक्झिट घेतली असली तरी मालिकेत आणखी एक नवा चेहरा दिसतोय. ती म्हणजे राणादाची मुलगी लक्ष्मी गायकवाडची मालिकेत एन्ट्री झाली आहे. वाचा: मध्यंतरी मालिकेत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. नंदिता वहिनींनी राणाचा घडवून आणलेला अपघात. राणाची पुन्हा एन्ट्री. त्यानंतर राजा राजगोंडा बनून नंदिताला धडा शिकवणे यांमुळं मालिकेनं टीआरपीच्या शर्यतीतही नंबर मिळवला होता. लक्ष्मीच्या एन्ट्रीनं मालिका कोणतं नवं वळण घेतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. फोटो: