हैदराबाद: मंत्री म्हणाले, देवानंच न्याय केला! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 6, 2019

हैदराबाद: मंत्री म्हणाले, देवानंच न्याय केला!

https://ift.tt/2r9JUf3
हैदराबाद: महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना पोलीस चकमकीत ठार मारण्यात आल्यानंतर तेलंगणचे कायदा मंत्री यांनी पोलिसांचं कौतुक केलं. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते मारले गेले. देवानंच न्याय केला. आरोपींना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली, असं ते म्हणाले. हैदराबाद बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, पोलीस चकमकीत मारले गेले. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं पोलिसांना त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. त्यानंतर राज्याचे कायदा मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, ते चकमकीत मारले गेले. देवानंच त्यांना कर्माची शिक्षा दिली आहे, असं ते म्हणाले. पोलिसांजवळील शस्त्रे हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न आरोपींनी केला, असा दावाही त्यांनी केला.

मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल आरोपी चकमकीत मारले गेल्यानंतर पीडितेच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हाच न्याय आहे आणि माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, असं ते म्हणाले. पीडितेच्या बहिणीनंही प्रतिक्रिया दिली आहे. 'विक्रमी वेळेत ही कारवाई झालीय. पोलीस, माध्यमे आणि तेलंगण सरकारचे आभार मानते,' असं ती म्हणाली. आरोपी पळून जात होते... बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी शुक्रवारी सकाळी चकमकीत मारले गेले. आरोपींना 'सीन रिकंस्ट्रक्शन'साठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या आवाहनालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 'निर्भया'च्या आईनं व्यक्त केला आनंद दिल्लीतील निर्भयाच्या आईनंही या एन्काउंटरनंतर आनंद व्यक्त केला आहे. यापेक्षा मोठा न्याय होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या देशाच्या न्यायव्यवस्थेला आणि सरकारला मी विनंती करते की, निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकवा, असंही त्या म्हणाल्या.