नवी दिल्ली: जर तुम्ही तुमच्या शारीरिक फिटनेसबाबत जागरूक असाल आणि मानसिक आरोग्याचा जराही विचार करत नसाल, तर आता तुम्ही तुमच्या मानसिक आयोग्याकडे पाहण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. हे आत्ताच सूचवण्याचे कारण म्हणजे देशात दर ७ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती गंभीर मानसिक आजाराने ग्रासला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती 'लॅन्सेट सायकॅट्री' नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. जर्नलमध्ये देण्यात आलेली आकडेवारी २०१७ पासूनची आहे. देशातील २० कोटी लोक मानसिक आजारी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. (डिप्रेशन) आणि एंग्झायटी हे सर्वसाधारण आढळून आलेले आजार आहेत. या आजारांनी पीडित असलेल्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. हा अभ्यास ‘इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटीव्ह’ने केला आहे. भारतात सन १९९० पासून ते सन २०१७ पर्यंत म्हणजेच २७ वर्षांच्यां काळातील आकडेवारीवर आधारित आहे. हा लेख सोमवारी प्रसिद्ध झाला. भारतात १९.७ टक्के म्हणजेच २० कोटी लोक मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. असलेले लोक देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १४.३ टक्के इतके आहेत. यांपैकी ४.६ कोटी लोकांना नैराश्याने (डिप्रेशन) ग्रासले आहे. तर ४.५ कोटी लोक एग्झायटीने त्रस्त होते. नैराश्य आणि मुख्य कारण आहे नैराश्य आणि चिंता विकार या मानसिक आजारांचे मुख्य कारण ताण हेच असल्याचे एम्समधील मनोदोष चिकित्सा विभागीत प्राध्यापक आणि या विषयाशी संबंधि अभ्यास प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. राजेश सागर यांनी म्हटले आहे. तसेच मुलांमध्ये त्यांना घाबरवणे आणि धमकावणे या कारणांमुळे नैराश्य आणि चिंता विकार बळावत असल्याचे डॉ. सागर यांनी सांगितले. इतकेच नाही, तर सामाजिक संरचनेत होत असलेल्या बदलांमुळे देखील मानसिक आजार वाढत असल्याचे ते म्हणाले. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने आपल्या समस्यांबाबत कुटुंबातील लोक घरातील इतर सदस्यांशी बोलत आपले मन हलके करत असत. आता विभक्त कुटुंब पद्धतीत हे शक्य होताना दिसत नाही. म्हातारपणाकडे झुकलेले लोक अधिक त्रस्त भारतीतल अर्धे वय उलटून गेलेल्या लोकांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे या अभ्यासात दिसून आले. मानसिक आजार हे आत्महत्येचेही कारण असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. या आजारांशी लढण्यासाठी प्रभावी रणनीती लागू करण्याची आवश्यकता असल्याचे आभ्यासात सूचित करण्यात आले आहे.