शेतकरी पुत्र विधानसभाध्यक्ष झाल्याचा आनंदःCM - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 1, 2019

शेतकरी पुत्र विधानसभाध्यक्ष झाल्याचा आनंदःCM

https://ift.tt/2LbhO9R
मुंबईः भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार यांची बिनविरोध विधानसभाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यांनी विधानसभा अध्यक्षांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. शेतकरी पुत्र विधानसभा अध्यक्ष झाल्याचा मला आनंद झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना सभागृहात व्यक्त केल्या आहेत. भाजपने ऐनवेळी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवडीची घोषणा केली. त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले व स्वागत केले. महाराष्ट्राचा शेतकरी पुत्र विधानसभा अध्यक्ष झाल्याचा मला आनंद झाला आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. स्पष्ट बोलणारा, अन्याय सहन न करणारी अशी व्यक्ती विधानसभा अध्यक्षपदी बसली आहे, याचा आनंद आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. नाना पटोले हे आधी भाजपचे खासदार म्हणून निवडून गेले होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.

नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात बोलताना म्हणाले की, हे सभागृह राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. सर्व परिस्थिवर मात करीत तुम्ही इथपर्यंत आले आहात. जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावत या ठिकाणी पोहोचला आहात. तुमचा स्वभाव हा बंडखोर आहे, मला माहिती आहे. आपलं मत मांडण्यासाठी कुणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा महाराष्ट्राचा सुपुत्र अशी तुमची ओळख आहे, असे म्हणत त्यांनी त्यांचे स्वागत केले. पुढे बोलताना उद्धव म्हणाले, माझ्याकडून काही चुका राहिल्यास आपले २५-३० वर्षाचे जे काही नाते होते त्याची आठवण ठेऊन सहकार्य करा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपला चिमटा काढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे सभागृहात दिसले.