IND vs WI: भारतासाठी खास ठरेल 'हा' विजय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 15, 2019

IND vs WI: भारतासाठी खास ठरेल 'हा' विजय

https://ift.tt/35xYHPD
चेन्नई: क्रिकेटमध्ये एक काळ असा होता जेव्हा वेस्ट इंडिजचा विजयी रथ भल्याभल्या संघांना रोखता येत नसे. तेव्हा भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध अनेक सामने गमावले होते. भारताचे विंडीजविरुद्ध () चे विजय आणि पराजयाचे प्रमाण अत्यंत खराब होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. अशातच दोन्ही संघांमधील पहिला वनडे चेन्नईत होत आहे. टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता वनडे मालिकेत दणदणीत यश मिळवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. भारतासाठी विजय असेल 'खास' आज होणाऱ्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर वेस्ट इंडिज विरुद्धच्या जय-पराजयाच्या प्रमाणात टीम इंडिया प्रथमच पुढे जाईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध प्रत्येकी ६२ विजय मिळवले आहेत. नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत विंडीजने एका सामन्यात विजय मिळवत मुकाबला सोपा असणार नाही असा इशारा दिला होता. चेन्नईत होणारा पहिला सामना जर भारताने जिंकला तर तो वेस्ट इंडिजविरुद्धचा हा ६३वा विजय असेल आणि भारत वेस्ट इंडिजच्या पुढे जाईल. टारगेट नंबर-१० वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचे पारडे जड आहे. विंडीजविरुद्ध सलग १०वी वनडे मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सलग ९ वनडे मालिका जिंकल्या आहेत. पण या मालिकेत विजय मिळवणे भारतीय संघासाठी सहज असणार नाही. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. भुवनेश्वरच्या जागी संघात मुंबईच्या शार्दुल ठाकूरला तर शिखरच्या जागी लोकेश राहुल याला संघात स्थान देण्यात आले आहे. पावसाचे सावट चेन्नईत होणाऱ्या सामन्यात हवामान मोठा अडथळा ठरू शकते. चेन्नईत गेल्या २४ तासापासून पाऊस पडत आहे. रात्रभर पाऊस झाल्याने मैदान ओलं आहे. पावसामुळे भारतीय संघाचे सराव सत्र देखील रद्द करावे लागले होते. शहरात शुक्रवारपासून पाऊस पडत आहे. शनिवारी देखील ढगाळ वातावरण त्यामुळे दोन्ही संघांची नजर हवामानावर असणार आहे. पिच चेन्नईतील एम.चिन्नास्वामी स्टेडियमवरील पिच संध मानली जाते. हे पिच फिरकीपटूंना मदत करणारे आहे. सप्टेंबर २०१७मध्ये येथे झालेल्या वनडे सामन्यात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या ५ फलंदाजांना बाद केले होते.