Ind vs WI: विंडीजविरुद्ध भारताची पहिली फलंदाजी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 15, 2019

Ind vs WI: विंडीजविरुद्ध भारताची पहिली फलंदाजी

https://ift.tt/2EjZast
चेन्नई: भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने (india vs west indies) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात वेस्ट इंडिजविरुद्ध भारत प्रथम फलंदाजी करण्यास उतरेल. याआधी भारताने टी-२० मालिकेत विजय मिळवला असून तशीच कामगिरी पुन्हा करण्याचा विराट कोहली आणि कंपनीचा प्रयत्न असेल. चेन्नईच्या या मैदानावर दोन वर्षानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय वनडे होत आहे. या मैदानावर १७ सप्टेंबर २०१७ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अखेरचा सामना झाला होता. त्या सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला होता. नाणेफेक झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने मनीष पांडे, शार्दुल ठाकूर, मयांक अग्रवाल आणि युजवेंद्र चहल या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले. भारताकडून या सामन्यात शिवम दुबे वनडेत पदार्पण केले आहे. भारतासाठी विजय असेल 'खास' आज होणाऱ्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर वेस्ट इंडिज विरुद्धच्या जय-पराजयाच्या प्रमाणात टीम इंडिया प्रथमच पुढे जाईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध प्रत्येकी ६२ विजय मिळवले आहेत. नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत विंडीजने एका सामन्यात विजय मिळवत मुकाबला सोपा असणार नाही असा इशारा दिला होता. चेन्नईत होणारा पहिला सामना जर भारताने जिंकला तर तो वेस्ट इंडिजविरुद्धचा हा ६३वा विजय असेल आणि भारत वेस्ट इंडिजच्या पुढे जाईल. टारगेट नंबर-१० वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचे पारडे जड आहे. विंडीजविरुद्ध सलग १०वी वनडे मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सलग ९ वनडे मालिका जिंकल्या आहेत. पिच चेन्नईतील एम.चिन्नास्वामी स्टेडियमवरील पिच संध मानली जाते. हे पिच फिरकीपटूंना मदत करणारे आहे. सप्टेंबर २०१७मध्ये येथे झालेल्या वनडे सामन्यात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या ५ फलंदाजांना बाद केले होते. असा आहे भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, दीपक चाहर, कुलदीप यादव, मोहम्मद शम आणि रवींद्र जडेजा.