
नवी दिल्ली: ईशान्य दिल्लीतील तीन दिवस झालेल्या हिंसाचारानंतर आज चौथ्या दिवशी तणावपू्र्ण शांतता आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १८ लोकांचा बळी गेला आहे. तर, जखमींची संख्या २०० हून अधिक झाली आहे. ईशान्य दिल्लीत आज काय परिस्थिती आहे, पाहुया... Live अपडेट्स... >> हिंसाचारातील मृतांचा आकडा १८ वर पोहोचला, गुरुतेग बहादूर हॉस्पिटलमध्ये एमडी सुनील कुमार गौतम यांची माहिती. >> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचारात जखमी झालेले डीसीपी अमित शर्मा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली, तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. >> ४ मृतांना रुग्णालयात आणले गेले.... हिंसाचारात मृत्यू पावलेल्यांची संख्या १७- गुरुतेग बहादूर (जीटीबी) हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांची माहिती