ऋषी कपूर: राजकीय क्षेत्राने व्यक्त केला शोक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 30, 2020

ऋषी कपूर: राजकीय क्षेत्राने व्यक्त केला शोक

https://ift.tt/2xlGn0b
नवी दिल्ली: ज्येष्ठ सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना काल त्यांना सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनावर देशातील राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ऋषी कपूर हे केवळ महान अभिनेतेच नव्हते, तर ते एक चांगला माणूसही होते, अशा शब्दात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. आम्ही विद्यार्थीदशेपासून ऋषी कपूर यांचे चित्रपट पाहत मोठे झालो, ते अष्टपैलू अभिनेते होते, असे प्रसाद म्हणाले. हा आठवडा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी भयंकर असा आहे. ऋषी कपूर हे उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.