मुंबई- भारतीय आणि सिनेप्रेमींसाठी गेले २४ तास हे एखाद्या काळ्या दिवसाप्रमाणे होते. अवघ्या २२ तासांमध्ये देशाने आणि या दोन महान कलाकारांना कायमचं गमावलं. २९ एप्रिलला इरफान खान यांचं निधन झालं तर आज ३० एप्रिलला ऋषी यांनी जगाचा निरोप घेतला. अमेरिकेत केले होते उपचार ३ ऑक्टोबर २०१८ ला ऋषी यांना कर्करोग असल्याचं कळलं होतं. यानंतर उपचारांसाठी ते अमेरिकेत गेले होते. ११ महिने ११ दिवसांच्या उपचारांनंतर ते भारतात परतले होते. मुंबईत आल्यानंतर चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं होतं.
ऋषी यांनी आज घेतला अखेरचा श्वास भारतात परतल्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी नव्हती. अनेकदा त्यांना श्वसनाचे त्रास जाणवले. बुधवारी त्यांना सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. आज सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राण ज्योत मालवली. दोन वर्ष ते ल्यूकेमिया आजाराशी लढा देत होते. काल इरफान खानचं झालं निधन बुधवारी बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं होतं. मुंबईतील कोकिलाबेन इस्पितळात वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवाली २०१८ मध्ये इरफानला कॅन्सर असल्याचं समोर आलं होतं. दोन वर्षांनंतर कॅन्सरशी सुरू असलेल्या लढाईत त्यांनी हार मानली कोलन इन्फेक्शनमुळे त्यांचं निधन झालं. लॉकडाउनमध्ये झाले अंत्यसंस्कार वर्सोवा येथील स्मशानभूमीत इरफान खान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाउनमुळे फक्त २० जणांना अंतयात्रेत जाण्याची परवानगी दिली होती. याशिवाय स्मशानभूमीत घरातल्या फक्त ५ जणांना जाण्याची परवानगी होती.