असं तयार झालंय पंतप्रधान मोदींचं २० लाख कोटींचं पॅकेज! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 13, 2020

असं तयार झालंय पंतप्रधान मोदींचं २० लाख कोटींचं पॅकेज!

https://ift.tt/2SXn7gP
नवी दिल्ली : करोना संकटादरम्यान मंगळवारी यांनी पुन्हा एकदा देशाला संबोधित केलंय. या संबोधनात त्यांनी देशासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. हे पॅकेज 'स्वावलंबी भारता'चं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेलं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देशाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक पॅकेज ठरलंय. विशेष आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारत अभियानासाठी महत्त्वाचं ठरेल. स्वावलंबी भारताला एक नवी गती देणारं हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. या आर्थिक पॅकेजशी निगडीत संपूर्ण माहिती अर्थ मंत्री निर्मला सीतारमण येणाऱ्या काही दिवसांत देतील, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय. अर्थ मंत्र्यांनी केलेल्या आर्थिक घोषणा आणि रिझर्व्ह बँकेचे निर्णय तसंच खुद्द पंतप्रधानानांनी घोषित केलेलं पॅकेज जोडलं तर हे जवळपास २० लाख कोटींचं पॅकेज आहे. त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात या पॅकेजबद्दल उत्सुकता वाढलीय. वाचा : वाचा : वाचा : आरबीआयकडून याअगोदर जाहीर झालेलं पॅकेज उल्लेखनीय म्हणजे, करोना संकटादरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) आत्तापर्यंत दोन टप्प्यांत जवळफास ४.७४ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलीय. सर्वप्रथम २७ मार्च रोजी रिझर्व्ह बँकेनं रोख वाढविण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली होती. यावेळी रेपो रेटमध्ये ७५ बेसिस पॉईंटची कपात करण्याची घोषणाही आरबीआयनं केली होती. तर सीआरआर (Cash Reserve Ratio) घटवून ४ वरून ३ टक्क्यांवर आणण्यात आला. अगोदर टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (TLTRO) द्वारे एक लाख करोड रुपयांची रोकड प्रवाहात आणणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. यातून जवळपास ३.७४ लाख कोटी रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होईल असं म्हटलं गेलं. अर्थमंत्र्यांकडून जाहीर झालेलं पॅकेज १७ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पुन्हा रोख वाढवण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या उपायांची घोषणा केली. तर अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी १.७ लाख रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली होती. यानुसार, गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना थेट मदत करण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. याचाच अर्थ आत्तापर्यंत जवळपास ६.४४ लाख कोटी (आरबीआयचे ४.७४ लाख कोटी आणि अर्थमंत्र्यांचे १.७ लाख कोटी) रुपयांच्या पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाच्या अगोदरच झालेली आहे. त्यामुळे आता मोदींनी जाहीर केलेल्या २० कोटींच्या पॅकेजमध्ये जवळपास १३.५० लाख कोटी रुपये वाढीव असतील. वाचा : वाचा :