भारतीय संघाने दौरा करावा हीच आमची इच्छा! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 16, 2020

भारतीय संघाने दौरा करावा हीच आमची इच्छा!

https://ift.tt/361StZh
नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे सामने तसेच आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे क्रिकेट पुन्हा कधी सुरू होईल याबाबत नक्की सांगता येणार नाही. यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवर अनिश्चिततेचे सावट आहे. वाचा- नियोजित वेळानुसार आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा होता. जून-जुलैमध्ये होणाऱ्या या दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला या दौऱ्याबाबत गंभीरपणे विचार करण्यास सांगितले आहे. श्रीलंका बोर्डाची इच्छा आहे की भारतीय संघाने दौऱ्यावर यावे. यासंदर्भात त्यांनी बीसीसीआयला एक मेल देखील केला आहे. पण बीसीसीआयकडून त्याला अद्याप उत्तर दिले गेले नाही. करोना व्हायरसमुळे भारताचा हा दौरा संकटात आहे. वाचा- खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षेचा विचार करून संपूर्ण दौरा मोकळ्या मैदानात प्रेक्षकांशिवाय घ्यावा लागेल. अर्थात बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केले आहे की जोपर्यंत सरकारकडून स्पष्ट आदेश मिळत नाहीत आणि प्रवास करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. वाचा- टी-२० वर्ल्ड कप २०२२ साली? करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला जगभरात चिंतेचे वातावरण आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर करोनाचे सावट आहे. विश्वचषकाबाबत काही खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आपली मते मांडली आहेत. यामध्ये बहुतांशी व्यक्तींनी विश्वचषक ऑक्टोबरमध्ये होणे कठीण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयसीसी आता विषयावर गंभीर झाली आहे.काही जणांच्या मते ही स्पर्धा सध्याच्या घडीला रद्द करावी आणि ती २०२२ साली खेळवण्यात यावी, असे समजत आहे. पण यावर आयसीसीच्या बैठकीमध्येच निर्णय होऊ शकतो. आयसीसीची ही बैठक २८ मे या दिवशी होणार आहे.