आसाम-मेघालयात पुराचा कहर; सुमारे २ लाख लोकांना तडाखा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 27, 2020

आसाम-मेघालयात पुराचा कहर; सुमारे २ लाख लोकांना तडाखा

https://ift.tt/3epvkTg
नवी दिल्ली: आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात सतत झालेल्या पावसामुळे अनेक भागात आला आहे. मंगळवारपासून राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडत असताना आसामच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन लाख लोक या पुराच्या तडाख्यात सापडलेले आहेत. हीच परिस्थिती मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही पाहायला मिळत आहे. या बाबत आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिलेल्या माहितीनुसार, धेमाजी, लखीमपूर, दरंग, नलबारी, गोलपारा, दिब्रूगड आणि तिनसुकिया या एकूण १७ महसूल क्षेत्रातील २२ गावे पूरग्रस्त झाली आहेत. एकूण १,९४, ९१६ लोकांना पुराचा फटका बसला आहे. यांपैकी ९००० जणांनी ढेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तीनसुकिया जिल्ह्यातील मदत शिबिरात व्यवस्था करण्यात आली आहे. या पुरामुळे जवळपास १,००७ हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. तसेच, सुमारे १६,५०० पाळीव प्राणी आणि कुक्कुटपालनावर परिणाम झाला आहे. राज्यातील बहुतेक नद्या, अनुक्रमे सोनीतपूर आणि नेमातिघाट (जोरहाट) मधील जियाथाली आणि ब्रह्मपुत्र या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. दरम्यान, सोमवारी अरुणाचल प्रदेशमधील दिबांग व्हॅली जिल्ह्यातील अर्जू गावात दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील बऱ्याच भागांना फटका बसला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मृताच्या नातलगांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. लोकांना पूर आणि भूस्खलनापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत. आसाम आणि मेघालयात २६ मे ते २८ मे या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा रेड अलर्ट जारी करणार्‍या भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील तीन दिवस तीन राज्यांची स्थिती गंभीर असेल अशी शक्यता वर्तवली आहे.