औरंगाबाद अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख: CM ठाकरे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 8, 2020

औरंगाबाद अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख: CM ठाकरे

https://ift.tt/2LcLZx8
मुंबई: येथे रेल्वे अपघातात ठार झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या दुर्देवी अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त करतानाच परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. कामगारांनी धीर सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने राज्याचे मुख्य सचिव आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यत अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परटतील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका असे आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे, त्याठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जाईस्तोवर आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करतो आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका. रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे व सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितलं.