देशात करोनाची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 6, 2020

देशात करोनाची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी

https://ift.tt/3cDi7Fl
नवी दिल्ली: देशात अनलॉक -१ चा पहिला टप्पा सुरू होण्यापूर्वीच कोरोनाबाधितांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, करोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ३६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या वाढून २,३६,६५७ इतकी झाली आहे. तर या आजाराने आतापर्यंत ६,६४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, गेल्या २४ तासात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत एकूण२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांची ही संख्या आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे दर्शवत आहे.. तथापि, अशा परिस्थितीत दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी १,१४,०७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशात करोनाबाधित बरे होण्याचा दर ४८.२० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. बरे होण्याच्या दरात किंचित घट झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत च्या एकूण ४५,२४,३१७ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत १,३७,९३८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. वाचा- संसर्गाचा विचार करता भारत जगभरात सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोविड -१९ ची लागण झालेल्या रूग्णांची संख्या इटलीच्या तुलनेत जास्त आहे. काही दिवसांपूर्वीच बाधितांच्या संख्येच्या दृष्टीने भारताने चीनलाही मागे सारले होते. अमेरिकेत जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. दिल्लीत कोविड -१९च्या रुग्णांची संख्या २६ हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत दिल्लीत १,३३० नवे रुग्ण आढळले. तर, संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या २६,३३४ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ४१७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०,३१५ रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत या विषाणूमुळे २५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ४ मे ते २ जून या काळात ३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद उशिरा करण्यात आली. त्यामुळे मृतांचा आकडा आता ७०८ वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनाने बळी घेतलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला सरकारने ६५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. राज्यातील कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमावलेल्या प्रत्येक पोलिस कर्मचार्‍याच्या कुटुंबाला ६५-६५ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात येतील, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी जाहीर केले. याशिवाय कुटुंबातील सदस्यालाही सरकारी नोकरी दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत कोरोना विषाणूमुळे कमीतकमी ३१ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत राज्यात ८०,२२९ लोकांना करोनाची लागण झाली असून, त्यांपैकी २,८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.