काँग्रेस एवढी लाचार कधीच नव्हती; विखेंचा थोरातांवर 'नेम' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 19, 2020

काँग्रेस एवढी लाचार कधीच नव्हती; विखेंचा थोरातांवर 'नेम'

https://ift.tt/3fEsUkt
म. टा. प्रतिनिधी, नगर 'एवढी वर्ष काँग्रेस सोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष यापूर्वी आपण कधीच पाहिले नाहीत, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. (Vikhe-Patil takes a jibe at Balasaheb Thorat) सरकारमधील काँग्रेसची नाराजी आणि त्यानंतर त्यावर पडलेला पडदा, या संबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील बोलत होते. शिर्डी येथे पत्रकारांशी त्यांनी या विषयावर संवाद साधला. त्यांचे पारंपरिक राजकीय स्पर्धक यांचे नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना उद्देशून त्यांनी ही टीका केली. विशेष म्हणजे कुरबुरी सुरू असताना विखे पाटील यांनी या वादावर भाष्य करणे टाळले होते. विखे पाटील म्हणाले, 'सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षां कोणी विचारत नाही. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांनाही विचारले जात नाही. तरीही काँग्रेस सत्तेसाठी सरकारमध्ये आहे. सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत. त्यांच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सत्ता सोडून सरकारमधून बाहेर पडावे. सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या पक्षाच्या मुखपत्रातून कुरकुरणारी जुनी खाट अशा शब्दांत खिल्ली उडवली तरी काँग्रेस नेतृत्वाला काहीही वाटत नाही. एवढे सर्व होऊनही आम्ही समाधानी आहोत असे जर ते म्हणत असतील तर तो एक मोठा विनोद आहे किंवा मग ते सत्तेसाठी लाचार आहेत, असे म्हणावे लागेल. एवढा अपमान होऊनही काँग्रेस सत्ता सोडेल, अशी यांच्याकडून अपेक्षा करता येणार नाही.' मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात? 'राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची कोणतीही नाराजी नव्हती. महाविकास आघाडी भक्कम आहे आणि पाच वर्षे चांगले काम करेल', असे थोरात यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचे सांगत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अलिकडेच नाराजी व्यक्त केली होती. मात्र याबाबत घुमजाव करत थोरात यांनी या विषयाला पूर्णविराम लावला. मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी झालेल्या चर्चेत काही प्रशासकीय तसेच काही विभागाचे विषय होते. राज्यातील नागरिकांसंबंधित काही महत्त्वाच्या विषयांवर समोरासमोर सकारात्मक चर्चा झाली. प्रामुख्याने करोनाच्या संकटात अडकलेल्या गरिबांना कशी मदत करता येईल याविषयी ही चर्चा होती. तथापि कोणताही वैयक्तिक मुद्दा नव्हता, असे थोरात म्हणाले होते.