सैन्य मागे घ्या; उच्चस्तरीय बैठकीत भारताने चीनला बजावले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 23, 2020

सैन्य मागे घ्या; उच्चस्तरीय बैठकीत भारताने चीनला बजावले

https://ift.tt/2YmC3Zc
नवी दिल्ली: भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी लेफ्टनंट जनरल स्तरावर चर्चा झाली. एलएसीच्या पलिकडे चीनच्या भागात असलेल्या मोल्डो परिसरात दोन्हीकडील सैन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. ही बैठक सुमारे १२ तास चालली. या बैठकीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चीनने भारतीय भूभाग असलेल्या त्सो भागात असलेले चीनी सैन्य मागे घ्यावे असे असे भारताने चीनला निक्षून सांगितले आहे. या भागात ज्या प्रमाणे एप्रिल महिन्यात जी स्थिती होती, तशीच स्थिती अर्थात जैसे थे स्थिती पुन्हा आणावी असे भारताने या बैठकीच चीनला ठासून सांगितले. या भागातील फिंगर ८ ते फिंगर ४ पर्यंत चीनचे सैन्य सरकले आहे. चीनने ते सैन्य फिंगर ४ पर्यंत मागे न्यावे असे भारताने चीनला स्पष्टपणे सांगितले आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या बैठकीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि चीनदरम्यान गेल्या आठवड्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेनंतरचा तणाव कमी करण्याच्या उद्देशाने सोमवारी दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान लेफ्टनंट जनरल स्तरावर दुसऱ्या टप्प्यातील बैठक पार पडली. देशाच्या लष्कर प्रमुखांनी पूर्व लडाखमधील स्थितीचीही विस्तृत समीक्षाही केली. गलवाल खोऱ्याच गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसक घटनेत भारताचे २० जवान शहीद झाले. पूर्व लडाखमध्ये चुशुल सेक्टरमधील चीनच्या भागात असलेल्या मोल्डो येथे सकाळी सुमारे ११.३० वाजता ही बैठक सुरू झाली होती. वाचा: भारताला सीमेवर हवी एप्रिल महिन्यातील स्थिती या चर्चेदरम्यान पूर्व लडाखमधून सैन्य हटण्यासाठी वापरायच्या योजनेला अंतिम रुप देण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे. एलएसीवर जी स्थिती एप्रिल महिन्यात होती तीच स्थिती आजही असायला हवी, असे भारताने चीनला स्पष्ट शब्दात सांगितले आहे. याचाच अर्थ चीनने आपल्या सीमेवर परत जावे असेच भारताने चीनला स्पष्टपणे सांगितले आहे. दोन्ही पक्षांदरम्यान ६ जूनला याच ठिकाणी लेफ्टनंट जनरल स्तरावरील पहिली बैठक पार पडली होती. या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेला तणाव दूर करण्याच्या कराराला अंतिम स्वरूप दिले होते. मात्र, १५ जूनला झालेल्या हिंसक घटनेनंतर सीमेवरील स्थिती बिघडली. याचे कारण म्हणजे दोन्ही पक्षांनी ३,५०० किमीच्या वास्तविक सीमेजवळ अधिकांश क्षेत्रात आपल्या सैन्याची तैनाती अधिक तीव्र केली. वाचा: वाचा: