
नवी दिल्ली: Bharat, that is (भारत, अर्थात इंडिया), असे भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमात देशाचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र, भारत हा देश एकच असताना, देशाला २ नावे कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत हे प्रकरण आता याचिकेच्या स्वरूपात सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. भारत हा शब्द गुलामगिरीचे लक्षण आहे, असा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद आहे. आणि म्हणून त्याऐवजी भारत किंवा हिंदुस्थान या शब्दांचा वापर करावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. घटनेतील कलम १ मध्ये दुरुस्ती करून भारत हा शब्द हटवावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. भारत, अर्थात इंडिया राज्यांचा संघ असेल, असे कलम १ मध्ये म्हटलेले आहे. त्याऐवजी भारत हा शब्द काढून टाकावा आणि भारत किंवा हिंदुस्थान असा त्या ठिकाणी उल्लेख करावा. देशाला केवळ त्याच्या मूळ आणि अस्सल नावावरून ओळखले पाहिजे. इंग्रजी नाव हटवले जाणे, भलेही प्रतीकात्मक असेल, परंतु ते आमच्या राष्ट्रीयत्वाबद्दल, विशेषत: भविष्यातील पिढीसाठी अभिमानाचे लक्षण असेल, असे सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे. वास्तविक, इंडिया या शब्दाच्या जागी भारत असा बदल केल्यास स्वातंत्र्यलढ्यात आपल्या पूर्वजांच्या केलेल्या संघर्षमय सहभागाशी ते न्यायसंगत होईल,असे याचिकेत म्हटले आहे. उमा भारती यांनीही उपस्थित केला प्रश्न या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उमा भारती यांनी दोन दिवसांपूर्वी एकामागून एक सात ट्विट केले. उमा भारती म्हणाल्या, ' एक देश किंवा व्यक्तीची दोन नावे नसतात. जसे सूर्यप्रकाश दॅट इज सनलाइट, असे कोणाचे नाव असणार नाही. अशाच प्रकारे कोणाचेही नाव असे असणे हास्यास्पद आहे. कदाचित भारतमाता नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान होण्याची वाट पाहत होती, आता तिच्या कपाळावर लागलेला इंडिया शब्दाचा डाग पुसून टाकायला हवा, असे उमा भारती म्हणाल्या. आपल्या देशाचे नाव कसे पडलं? महाराजा भरताने संपूर्ण देशाचा विस्तार केला होता. त्याच्याच नावावर देशाचे नाव ठेवले गेले, असे सांगितले जाते. मध्ययुगात तुर्क आणि इराणी लोक येथे आले, त्यांनी सिंधू खोऱ्यातून प्रवेश केला. ते स उच्चार ह असा करत. आणि याचा सिंधु शब्दाचा अपभ्रंश हिंदू असा झाला. अशा प्रकारे हिंदूंच्या देशाला हिंदुस्थान असे नाव मिळाले. इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी इंडस व्हॅली, अर्थात सिंधू खोरे या नावावरूनच भारताचे नाव इंडिया असे ठेवले. याचे कारण त्यांना देशाचे नाव भारत किंवा हिंदुस्थान असे म्हणणे गैरसोयीचे होते.