करोना: दिवसभरातील विक्रमी वाढ; ११,२९२ नव्या रुग्णांची नोंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 14, 2020

करोना: दिवसभरातील विक्रमी वाढ; ११,२९२ नव्या रुग्णांची नोंद

https://ift.tt/3d11IKQ
नवी दिल्ली: जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून भारतातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात करोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे ३,२०,९२२ वर. तर, गेल्या २४ तासांमध्ये देशभरात करोनाचे ११,९२९ नवे रुग्ण आढळले. तसेच गेल्या २४ तासांमध्ये देशात एकूण ३११ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात एकूण ९,१९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी १,६२,३७९ रुग्णांनी करोनावर यशस्व मात केली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ५०.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रथमच रुग्ण बरे होण्याचा दर देशात ५० टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात, ५६,५८,६१४ लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. गेल्या २४ तासांत कोविड -१९ मध्ये १,५१,४३२ जणांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी ११,९२९ लोकांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. अशा प्रकारे, पॉझिटीव्ह रुग्णांचा दर ७.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. भारताव्यतिरिक्त जगातील अनेक देशांमध्ये करोनाचा कहर सुरू आहे. करोना विषाणूचा संसर्ग १८० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. तर, आतापर्यंत करोना विषाणूमुळे ४.२५ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, जगभरात एकूण ७६ लाखांहून अधिक लोकांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. हा आकडा दररोज वाढत आहे. वाचा: शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तर, आज दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांची आज दिल्लीत बैठक पार पडली.शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील परिस्थिती भयानक असल्याचे सांगत दिल्ली सरकारला फटकारले होते. कोरोना प्रकरणात दिल्ली हे राज्य महाराष्ट्र आणि तामिळनाडूनंतर तिसर्‍या क्रमांकावर आहे. वाचा: देशात समूह संसर्ग सुरू झाली की नाही? देशातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना केंद्र सरकारच्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) 'भारत अजूनही समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचलेला नाही', असा दावा केला आहे. मात्र, असा दावा करणे हे सद्यस्थितीपासून फारकत घेणारे आहे तसेच सत्याचा अस्वीकार करण्याचा दुराग्रह सरकार दाखवत असल्याची टीका देशभरातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशातील बहुसंख्य भागात समूह संसर्ग होत आहे, ही बाब सरकारने मान्य केली पाहिजे. जेणेकरून लोकही याकडे गांभिर्याने पाहतील, असे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 'आयसीएमआर'चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी गुरुवारी पत्रकारांना माहिती देताना, सेरोलॉजिकल सर्वेक्षणाची माहिती दिली होती. वाचा: