करोना: लॉकडाउनमुळे संसर्गाचे प्रमाण ९७% पर्यंत घसरले- ICMR - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 15, 2020

करोना: लॉकडाउनमुळे संसर्गाचे प्रमाण ९७% पर्यंत घसरले- ICMR

https://ift.tt/3frTGMG
नवी दिल्ली: देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण ६९ टक्के ते ९७ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचा दावा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) गठीत केलेल्या ऑपरेशन्स रिसर्च ग्रुपच्या संशोधकांनी केला आहे. लॉकडाउनमुळे आरोग्य यंत्रणेला संसाधने, सोयी-सुविधा वाढविण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी वेळ मिळाला. लॉकडाउननंतरची सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना आणि ती ६० टक्के प्रभावी राहणार आहे. या परिस्थिती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा साथीचा आजार आपली सर्वोच्च पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यानंतर ५.४ महिन्यांसाठी आयसोलेशन बेड, ४.६ महिन्यांसाठी आयसीयू बेड आणि ३.९ महिन्यांसाठी व्हेंटिलेटर कमी पडण्याची शक्यता आहे. वाचा: लॉकडाउनचा झाला मोठा फायदा तथापि, जर लॉकडाउन आणि सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्या गेल्या नसत्या, तर परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकली असती, असेही या अभ्यासात म्हटले आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सरकारने सातत्याने उचललेली पावले आणि वेगवेगळ्या राज्यांमधील संसर्गाची स्थिती वेगवेगळी असल्याकारणाने या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे. जर सार्वजनिक आरोग्य उपायांचे व्याप्ती ८० टक्क्यांपर्यंत वाढवली गेली तर, या साथीचा परिणाम कमी होऊ शकतो, असेही संशोधकांना वाटते. नोव्हेंबरमध्ये करोना गाठणार कळस नोव्हेंबरच्या मध्यावर भारतातील कोविड -१९ साथीची पातळी शिगेला पोहोचण्याची शक्यता असून या काळात 'आयसीयू बेड' आणि 'व्हेंटिलेटर' ची कमतरता भासू शकते, असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, लॉकडाउनमुळे कोविड -१९ या साथीचा आजार आठ आठवडे उशिराने शिगेला पोहोचेल. या अभ्यासानुसा लॉकडाउनने या आजाराचा प्रसाराचा शिगेला पोहोचण्याचा कालावधी ३४ ते ७६ दिवसांपर्यंत वाढला आहे. वाचा: ६०% मृत्यू टाळण्यात यश भारतातील कोविड -१९ च्या मॉडेल आधारित विश्लेषणानुसार, लॉकडाऊनच्या कालावधीत घेण्यात आलेल्या चाचण्या, उपचार आणि रुग्णांना वेगळे ठेवण्याची करण्यात आलेली व्यवस्था या मुळे हा आजारा शिगेला पोहोचत असताना रुग्णांची संख्या ७० टक्के कमी होणार आहे. तसेच, वाढत जाणारे रुग्णही सुमारे २७ टक्क्यांनी कमी होतील. कोविड -१९ मुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एकूण ६० टक्के मृत्यू टाळण्यात यश आले आहे. आणि एक तृतियांश मृत्यू टाळले जाण्याचे श्रेय आरोग्य सेवांमध्ये करण्यात आलेल्या वाढीला जाते, असे या अभ्यासात म्हटले आहे. वाचा: