हुश्श ; पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दर 'जैसे थे'च - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 3, 2020

हुश्श ; पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दर 'जैसे थे'च

https://ift.tt/2CZAsQF
मुंबई : इंधन दरवाढीला शुक्रवारी देखील लगाम बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मात्र मागील तीन आठवड्यात झालेल्या दरवाढीचे परिणाम बाजारात दिसू लागले आहेत. माल वाहतूक महागल्याने बाजारात भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत. कंपन्यांनी मंगळवारपासून चार दिवस इंधन दरात कोणतीही वाढ केलेली नाही. यामुळे तूर्त जनतेला दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या दर पत्रकानुसार शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ असून ७८.८३ रुपयांवर कायम आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.५३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये आहे. चेन्नईत डिझेल ७७.७२ रुपये आणि कोलकात्यात ७५.६४ रुपये आहे. जूनमधील सलग तीन आठवडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत होती. या कालावधीत पेट्रोल किमान ९. १७ पैसे आणि डिझेल ११ रुपयांनी महागले होते. परिणामी माल वाहतूक महागली. गेले काही दिवस बाजारात भाजीपाल्याच्या किंमती वाढु लागल्या आहेत. भाजीपाला, टोमॅटो, कांदे, बटाटे यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. माल वाहतूकदार तसेच टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी पेट्रोल-डिझेल महागल्याने दरवाढीचा इशारा दिला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४० डॉलर प्रती बॅरल आहे. त्यात मंगळवारी १.५ टक्क्याची वाढ झाली. तर ब्रेंट क्रूडचा भाव ४१ डॉलर प्रती बॅरल होता. मार्च महिन्यात कच्च्या तेलाचा भाव शून्याखाली गेला होता. मात्र देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवण्यास सुरुवात केली होती. ७ जूनपासून कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. मागील २३ पैकी २२ दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. या दरवाढीने दिल्लीत प्रथमच पेट्रोलच्या तुलनेत डिझेल महाग झाले. डिझेलचा भाव ८० रुपयांवर गेला. तर मुंबईत पेट्रोल ९० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. य़ा दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमची वाढत होत्या.हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला होता.