नफावसुली ; कमॉडिटी बाजारात सोने-चांदी झाले स्वस्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 3, 2020

नफावसुली ; कमॉडिटी बाजारात सोने-चांदी झाले स्वस्त

https://ift.tt/38pFwK4
मुंबई : कमॉडिटी बाजारात उच्चांकी स्तर गाठणाऱ्या सोन्यामध्ये नफेखोरांनी नफावसुली केल्याने सोने ४८८ रुपयांनी स्वस्त झाले. मात्र तरीही सोन्याचा दर प्रती १० ग्रॅमला ४९१३५ रुपये आहे. चांदीच्या दरात ११६८ रुपयांची घसरण झाली असून चांदीचा प्रती किलो दर ५०३२६ रुपये आहे. जळगावात गुरुवारी सोन्याच्या भावाने ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी सराफ बाजार उघडल्यानतंर सोन्याचा भाव ४९ हजार २०० तर जीएसटीसह ५१ हजार ५०० रुपयांवर पोहचला होता. आठवडाभरात सोन्याचे दोन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता देखील सराफ व्यावसायिकांनी वर्तवली आहे. चलन बाजारात रुपया वधारल्याने सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमॉडीटी विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले की गुरुवारी चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ५६ पैशांनी मजबूत झाला. रुपयाचे मूल्य ७५.०४ रुपये झाले. जागतिक बाजारात सोन्याचा भाव १७६९ डॉलर प्रती औंस खाली आला. त्यात कालच्या तुलनेत घसरण झाली. गुरुवारी त्याने १८०० डॉलरची पातळी ओलांडली होती. मागील आठ वर्षतला सोन्याचा उच्चांकी दर होता. चांदीचा भाव १७.९० डॉलर प्रती औंस आहे. goodreturns.in या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४७५५० रुपये झाला आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत ११०० रुपयांची घसरण झाली. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७१६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८३६० रुपये आहे. दिल्लीत सोने ४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४७५२० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८८१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३४० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०९५० रुपये झाला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर वाढत असून, याची लोकांना आता भीती वाटू लागली आहे. हा प्रादुर्भाव कमी न झाल्यास औद्योगिक उत्पादन अजून काही महिने बंद राहील. ते पुन्हा सुरू झाल्यावर त्याला मागणी येण्यास काही वेळ जावा लागणार आहे. लोकांच्या मनात अर्थविषयक बाबींबाबत साशंकता निर्माण होऊ लागली आहे. परिणामी लोकांचा आर्थिक जगावरील विश्वास उडायला लागल्यावर सोने हा एकमेव शाश्वत गुंतवणूक पर्याय वाटायला लागतो आणि तो असतोही... सोन्याएवढी गुंतवणूक शाश्वतता कशातच नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे. शेअर बाजार वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत खाली आलेले असतानाही सोने वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढले आहे.