शेअर बाजारात तेजी ; निर्देशांकांना खुणावतेय नवं शिखर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 7, 2020

शेअर बाजारात तेजी ; निर्देशांकांना खुणावतेय नवं शिखर

https://ift.tt/2O3Lk2p
मुंबई : सोमवारी भारतीय बाजारांपाठोपाठ युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजारात तेजीची लाट दिसून आली. अमेरिकेच्या सेवा क्षेत्रात अनपेक्षित वृद्धी झाल्याने तेथील भांडवली बाजारात वाढ झाली. तत्पूर्वी युरोपात देखील तेजीचे वातावरण होते. करोना व्हायरसमधून चीन सावरत असल्यांचे दिसून आले आहे. त्यामुळे उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. युरोपचा मुख्य इंडेक्स असलेल्या एसटीओएक्सएक्स ६०० हा १.६ टक्क्यांनी वधारला. जर्मन आणि फ्रान्समधील शेअर बाजार वधारले होते. वाचा : चॉईस ब्रोकिंगचे सुमित बगाडिया यांच्या मते जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी सध्या स्थानिक भांडवली बाजार तेजीत आहेत. निफ्टीने चार महिन्यांची उच्चांकी स्तर गाठला आहे. निफ्टीला १०८५० चा नवा स्तर खुणावत आहे. जर त्यात घसरण झाली तर १०५५० पर्यंत मर्यादित राहील, असे त्यांनी सांगितले. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चंदन तपारिया यांच्यामते निफ्टी ११००० ची पातळी गाठू शकतो. १०६०० अंकावर त्याला चांगला सपोर्ट आहे. त्यानंतर त्यात वाढ झाली तर लवकरच तो ११००० चा पल्ला गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आणि जागतिक बाजारांतून आलेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सलग चौथ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा वरच्या पातळीवर राहिला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांच्या कामगिरीमुळे सोमवारी सेन्सेक्स ४६६ अंकांनी वधारला आणि ३६,६६१.६६च्या पातळीवर गेला. त्यानंतर बाजार बंद होताना सेन्सेक्स ४६५.८६ अंकांनी वधारून ३६,४८७.२८च्या पातळीवर स्थिरावला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५६.३० अंकांनी वधारून १०,७६३.६५च्या पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक फायदा महिंद्र अँड महिंद्रच्या समभागाला झाला. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि टाटा स्टील आदी कंपन्यांच्या समभागात वाढ झाली. मात्र, दुसऱ्या बाजूला बजाज ऑटो, एचडीएफसी, भारती एअरटेल आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागांत घसरण दिसून आली. लडाख सीमेवरील भारत आणि चीनदरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात चीनी सामानाला विरोध करणे सुरू आहे. जनतेत ही भावना वाढीला लागत असताना केंद्र सरकार, सरकारी उपक्रम आणि विविध मंत्रालयांनीही चीनच्या औद्योगिक आणि व्यापार धोरणाला धोबीपछाड देणे सुरू केले आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर आता अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनीही चीनला धडा शिकवण्याचे ठरवले आहे.भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनची आर्थिक नाकेबंदी करत भारताने ५९ चिनी अॅपवर बंदी घातली. त्यानंतर देशातील मोठ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांवर बंदी घातली जाणार आहे.