हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?; आशिष शेलार यांची टीका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 13, 2020

हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?; आशिष शेलार यांची टीका

https://ift.tt/30Sijhb
मुंबई: काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे न सोडण्यात आल्याने भाजपचे नेते यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील मंत्र्यांना भांडखोर सासूची उपमा दिली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करून राज्य सरकारमधील समन्वयाच्या अभावावर टीकास्त्र सोडले आहे. कुठलाही ठोस निर्णय नाही. कसले नियोजन, समन्वय नाही. केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल्य या राज्यातील 'पाडून दाखवा सरकारकडे' आहे. कोकणात रेल्वे गाड्या सोडण्यावरून हेच सुरू आहे. रेल्वेची तयारी असतानाही राज्य सरकारने गाड्या सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला. आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही. एसटीही वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना कोकणात जावे लागले, असं सांगतानाच आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसले आहेत. 'पाडून दाखवा सरकारचे' हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?, असा संतप्त सवाल शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी यापूर्वीही ई-पासच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता. 'ई- भूमीजन" करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप "ई पास" देऊ शकले नाहीत. त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा! चाकरमान्यांच्या प्रवासाबाबत मुख्यमंत्री घोषणा करणार होते. एसटीच्या गाड्या सोडणार होते. हे सगळं कधी करणार,' असा सवाल शेलार यांनी केला आहे. 'कोकणी माणसाच्या संयमाचा अंत पाहू नका,' असा इशारा त्यांनी दिला होता.'आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे २५० रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा. त्यांना सुरक्षित सन्मानाने कोकणात जाण्यासाठी परवानगी द्या. बघ्याची भूमिका न घेता तातडीने निर्णयाची घोषणा करा,' अशी मागणीही शेलार यांनी केली होती.