चिनी सैनिकांकडून पाच भारतीयांचं अपहरण, आमदाराचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 5, 2020

चिनी सैनिकांकडून पाच भारतीयांचं अपहरण, आमदाराचा दावा

https://ift.tt/2Z8meW4
इटानगर : पूर्व लडाख भागात भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहचला असतानाच ईशान्य भारतातील हालचालींनाही वेग आलाय. याच दरम्यान अरुणाचल प्रदेशातील सीमेवर चिनी सेनेकडून करण्यात आल्याचं समोर येतंय. काँग्रेसचे आमदार (, MLA) यांनी हा धक्कादायक खुलासा केलाय. शनिवार सोशल मीडियाद्वारे त्यांनी पाच भारतीय नागरिक बेपत्ता असून त्यांचं चिनी सैनिकांकडून अपहरण करण्यात आल्याचं म्हटलंय. एरिंग यांच्या म्हणण्यानुसार, सुबनसिरी जिल्ह्यातील पाच भारतीय नागरिकांचं कथितरित्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी () कडून अपहरण करण्यात आलंय. उल्लेखनीय म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीही अशी घटना घडली होती. काँग्रेस आमदारांनी पंतप्रधान कार्यालयाला आपल्या ट्विटमध्ये टॅग करताना पीएलए आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनला याबद्दल सडेतोड प्रत्यूत्तर दिलं जायला हवं, असं त्यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : स्थानिक वर्तमानपत्र 'द अरुणाचल टाइम्स'मध्ये छापण्यात आलेल्या बातमीनुसार, अपहरण करण्यात आलेले पाच लोक तागिन समुदायाशी संबंधित आहेत. हे लोक जंगलात शिकार करण्यासाठी गेले असताना त्यांना चिनी सैनिकांकडून ताब्यात घेण्यात आलं. अपहृत नागरिकांच्या एका नातेवाईकानं ही माहिती दिलीय. ज्या लोकांचं अपहरण करण्यात आलंय त्यांची नावं टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारू डिरी अशी आहेत. घटना घडली तेव्हा घटनास्थळावर या पाच जणांसोबत आणखीन दोन ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु, अपहरणापूर्वीच ते पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचंही सांगण्यात येतंय. पीडित कुटुंबीयांनी शनिवारी भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं समजतंय. वाचा : वाचा :