उत्तर प्रदेशातील घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण; भाजपचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 3, 2020

उत्तर प्रदेशातील घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण; भाजपचा आरोप

https://ift.tt/3ioGidC
जालनाः 'भाजपनं उत्तर प्रदेशात झालेल्या दुर्दैवी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कठोरपणे कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. मात्र, महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील घटनेवरून राजकारण केल जात आहे,' असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी केला आहे. जालना जिल्ह्यात बदनापूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'योगी सरकार उत्तर प्रदेशातील परिस्थिती हातळण्यात अजिबात अपयशी ठरलेले नाही. भाजपचे सरकार असले तरी आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. घटनेची पाठराखण कुणीच करत नाही संजय राऊत म्हणतात पंतप्रधान या घटनेवर बोलत नाहीत या प्रश्नाचे उत्तर देताना दरेकर म्हणाले 'एवढ्या मोठ्या संजय राऊत यांना मला विचारायचे आहे रोह्याला भयंकर घटना झाली १४ वर्षांच्या तरुणीला सामूहिक बलात्कार करून दरीत फेकून दिले, पुण्याला घटना झाली त्या तरुणीला डोंगरावर नेऊन ठेचून मारण्यात आले. त्या वेळी काय झोपला होता काय? क्वारंटाइन सेंटर मध्ये बलात्कार होत आहेत त्याच्यावर तुम्हाला एक शब्द काढायचा नाही राज्यातील कायदा सुव्यवस्थाचेचा बोजवारा उडालेला आहे त्याच्यावर संजय राऊत, राज्याचे गृहमंत्री येऊन कधी बोलले नाहीत महाराष्ट्रात येथे अराजकता माजली आहे महिला सुरक्षित नाहीत त्याच्यावर भाष्य करायला वेळ नाही उत्तरप्रदेशात जे होतय त्याच राजकारण हे करत आहेत. राजकीय लोकांची करणी आणि कथनी वेगळी आहे,; असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला आहे. 'राज्यातील सरकार पाच वर्षे पूर्ण करो अथवा न करो त्याच्याशी आमचे काही देणं घेणं नाही. महाराष्ट्रातील जनता आज वेगवेगळ्या संकटाने ग्रासलेली आहे. आज करोनाचे संकट आहे. करोनाचा प्रादूर्भाव ग्रामीण भागात पसरतोय, निसर्ग वादळ कोकणात आलं त्यामुळं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं, विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी झाली सरकार न्याय देत नाही" अशी टीका दरेकर यांनी केली आहे. 'जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर गेला चार महिने झाले अद्यापही पंचनामे झाले नाहीत सरसकट पंचनामे झाले नाहीत अनेक लोक वंचित आहेत जिल्हा प्रशासन पोस्टमनच काम करत आहे. शेती उध्वस्त झाली आहे. सरकार काम करत नाही म्हणून आपल्याला मराठवाड्यात यावं लागलं सरकार घरात बसलं आहे आम्ही विरोधी पक्ष फिरतोय जनतेच्या सेवेतील त्रुटी सरकारच्या लक्षात आणून देतोय सारख्या सुचना करतोय पण सरकार घरात बसलं आहे,' असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. 'खरं म्हणजे सरकारने इथे बसून आढावा घेतला पाहिजे. भाजपचं सरकार होत तेव्हा आम्ही तात्काळ धावून जात होतो. आजच्या घडीलादेखील आम्हीच फिरतोय सरकार घरात बसलं आहे. आठवड्याभरात शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर भारतीय जनता पक्ष टोकाचा संघर्ष करणार असल्याचा इशारा दरेकर यांनी दिला.