
ाचेन्नई: सन २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तत्पूर्वी कारवाई करत काँग्रेसने खुशबू यांना पक्ष प्रवक्तेपदावरून हटवले होते. दरम्यान, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून खुशबू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण सन २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये आलो आणि लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपण अतिशय वाईट परिस्थितीत होतो, असे खुशबू यांनी पत्रात म्हटले आहे. आपण पक्षात पैसा, नाव किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुळीच आलो नव्हतो. पक्षात वरिष्ठ पदांवर बसलेले काही लोक आणि ज्यांचा जनतेशी कोणतीही ओळख नाही, असे नेते आपला हुकुम चालवत होते. आणि पक्षावर निष्ठा असलेले माझ्यासारखे लोक पूर्ण निष्ठेने काम करू इच्छित असताना अशा लोकांना बाजूला केले जात आहे, अशी तक्रार खुशबू यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या खुशबू यांनी यापूर्वी अनेक पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. सन २०१० मध्ये त्या डीएमकेमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी डीएमके सत्तेत होत्या. मला वाटतं की मी योग्य निर्णय घेतला आहे. मला लोकांची सेवा करणे आवडते. मला महिलांच्या भल्यासाठी काम करायचे आहे, असे त्यावेळी खुशबू म्हणाल्या होत्या. त्यानंतर चारच वर्षांनी त्यांनी डीएमके सोडला होता. त्याच वर्षी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मला वाटते की आता मी माझ्या घरात आहे. भारतील लोकांसाठी चांगले काम करू शकेल, त्यांना एकजूट ठेवू शकेल असा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या. मात्र खुशबू सुंदर यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आले नाही. त्यावेळी राज्यात डीएमके-काँग्रेस आघाडीला मोठा विजय मिळाला होता. मात्र, त्या वेळी देखील त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले नव्हते. क्लिक करा आणि वाचा- भाजपत जाण्याची शक्यता खुशबू सुंदर या राज्यात अतिशय लोकप्रिय आहेत. तामिळनाडूत आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणूक आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव देखील मर्यादित स्वरूपाचा आहे. यामुळे खुशबू यांची स्टार पॉवर आपल्याकडे घेण्यास उत्सुक असणार हे नक्की. भाजपकडे सध्या राज्यात करिश्मा असलेला कोणताही नेता नाही. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-