हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 27, 2020

हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

https://ift.tt/2Jm9pCc
मुंबई: ' हे अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्टी अशी सोडता येत नाही. हिंदुत्वाचंही तसंच आहे. सोडून द्यायला ते काही धोतर नाही,' असा जोरदार टोला मुख्यमंत्री यांनी आज भारतीय जनता पक्षाला व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हाणला. (Uddhav Thackeray slams over Hindutva in ) वाचा: महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं 'सामना'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलते होते. राज्यात 'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू करताना मंदिरं उघडण्याची मागणी भाजपनं लावून धरली होती. त्यासाठी राज्यात आंदोलनंही करण्यात आली. राज्यपाल कोश्यारी यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं होतं. हिंदुत्व सोडून 'सेक्युलर' झालात का, असा प्रश्नही राज्यपालांनी केला होता. 'सामना'च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं. वाचा: 'मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. देवळात घंटा बडवणारा नव्हे तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू त्यांना हवा होता. ते ९२-९३ साली त्यांनी करून दाखवलं. पूर्ण बहुमताचं सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची यांची (भाजपची) हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळं झालं. त्यामुळं आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं हे हिंदुत्व आहे काय? त्यानं करोना नाही जात हे सिद्ध झालेलं आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका. या देशातलं भगव्याचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्यामुळं निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व शिकवू नका. तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व नकोच,' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. वाचा: