
नवी दिल्ली: बिहारमध्ये रविवारी नव्या मुख्यमंत्र्यांच्या रुपात (Nitish Kumar) यांची औपचारिक निवड करण्यात आली. मात्र, उपमुख्यमंत्री कोण बनणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. प्रथम जेडीयू () पक्षाच्या आमदारांनी नीतीश कुमार यांची नेतेपदी निवड केली, त्यानंतर एनडीएच्या () आमदारांनी त्यांना आपला नेता निवडले. अशा प्रकारे नीतीश कुमार हे मुख्यमंत्रिपदासाठी नामनिर्देशित झाले. राज्यपालांना भेटून त्यांनी सरकार स्थापनेचा दावा देखील केला. आज सोमवारी ४ वाजता ते आपल्या सहकाऱ्यांसह सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मला मुख्यमंत्री बनायचे नव्हते, मात्र भारतीय जनता पक्षाच्या आग्रहावरून आणि निर्देशानंतर मी हे पद स्वीकारले आहे, असे नीतीश कुमार यांनी म्हटले आहे. ( will be sworn in as for the seventh time) एनडीएच्या आमदारांच्या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पर्यवेक्षकाच्या रुपात पाटण्यात उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदासाठी नीतीश कुमारांचे नाव सहज ठरले. मात्र सुशीलकुमार मोदी हे यावेळी उपमुख्यमंत्री असणार नाहीत हे देखील बैठकीत ठरले. पक्ष त्यांच्या जागी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. दोन उपमुख्यमंत्री बनवण्याची चर्चा उपमुख्यमंत्री कोण होईल हे आज शपथ ग्रहणादरम्यान स्पष्ट होईल. मात्र भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर प्रसाद आणि रेणु देवी यांची नावे जवळजवळ निश्चित मानली जात आहेत. या बरोबरच मागास, अतिमागास आणि महिला मतदारांनादेखील सोबत घेण्याचा प्रयत्न असणार आहे. भाजपमधील आणखी काही नावे उपमुख्यमंत्रिपदासाठी घेतली जात होती. त्यांना मोठी खाती दिली जाण्याची शक्यता आहे. नीतीश कुमारांपुढील आव्हान, मंत्रालयांचे वाटप नीतीश कुमार यांच्या शपथ ग्रहणानंतर मंत्रिमंडळाचा आकार किती असेल हे स्पष्ट होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे १८, जेडीयूचे १२, मुकेश सहनी आणि जीतन मांझी यांच्या पक्षातून प्रत्येकी १-१ मंत्री बनू शकतात. विधानसभा अध्यक्ष देखील भाजपमधून होण्याची शक्यता आहे. मंत्रालयांचे वाटप हे नीतीश कुमारांपुढील आव्हान असणार आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री राहिलेले सुशीलकुमार मोदी हे वित्तमंत्री होते. या व्यतिरिक्त भाजप जेडीयूकडून कर्मचारी किंवा गृह मंत्रालयाची मागणी करत आहे. ही दोन्ही खाती आतापर्यंत नीतीश कुमार यांच्याकडे होती. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत केंद्रातील मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. यात जेडीयूचे नेते आणि सुशीलकुमार मोदी यांना जागा मिळू शकते. या विस्तारात एलजेपीला स्थान मिळणार का, हे पाहावे लागेल. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-