
पुणे: 'पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक निकालांनंतर राज्य सरकार आणि नेतृत्व बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल,' असं वक्तव्य भाजपचे पुण्यातील खासदार () यांनी केलं आहे. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सरकार लवकरच पडेल अशी भाकितं विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्यानं केली जात आहेत. त्याबाबत बापट यांना विचारलं असता हे सरकार स्वत:हून पडेल, असं ते म्हणाले. 'महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. वेगवेगळी वक्तव्यं केली जात आहेत. समन्वयाच्या अभावामुळं हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळं हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही व त्यात आम्हाला रसही नाही. सरकार त्यांच्या वजनानेच पडेल. हे सरकार करोनाच्या काळातील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे. महापूर, अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वार्यावर सोडलं आहे. त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. सरकारच्या विरोधातील नाराजीचा फायदा पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांना होणार आहे. भाजपचे उमेदवार निवडून येतील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाचा: उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्यासाठी प्रयत्नशील असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांशी ते या संदर्भात चर्चा करणार आहेत. मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे. याबाबतही बापट यांनी मत मांडले. 'बॉलिवूडसह एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्यास मोठा वाव आहे. असं कामं होत असतील तर आनंद व्यक्त करायला हवा, दुःख व्यक्त करण्याचं कारण नाही. योगींच यांचं उत्तर प्रदेशातलं काम हे अभिनंदनीय आहे,' असं ते म्हणाले. वाचा: