करोनामुळे प्राण गमावणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्राची मदत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 16, 2021

करोनामुळे प्राण गमावणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्राची मदत

https://ift.tt/3u0jDex
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून करोना संक्रमणामुळे प्राण गमावणाऱ्या ३९ पत्रकारांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) कल्याण समितीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं सोमवारी मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार कल्याण समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत ३९ दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीच्या बैठकीदरम्यान सरकारी सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, करोनामुळे प्राण गमावणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीसाठी पत्रकार कल्याण कोषात जवळपास दीड कोटी रुपयांच्या अतिरिक्त राशीची तरतूद पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं केलंय. देशातील सर्व राज्यांचे पत्रकार या योजनेंगर्त लाभ घेण्यास पात्र आहेत. बैठकीत सहभागी झालेल्या पत्रकारांचे प्रतिनिधी संतोष ठाकूर यांनी देशातील सर्व पत्रकारांच्या आरोग्य आणि जीवन विमासंबंधी योजना सुरू करण्याचा आग्रह केला. सोबतच त्यांनी पत्रकारांना आयुष्यमान भारत योजनात सहभागी करून घ्यावं, अशी मागणीही केली. देशातील दरम्यान, देशातील एकूण करोना संक्रमितांचा आकडा ०१ कोटी ०९ लाख २५ हजार ३११ वर पोहचला आहे. यातील ०१ लाख ३४ हजार ०३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल, ०१ लाख ०६ लाख ३० हजार ८९२ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. तर आत्तापर्यंत एकूण १ लाख ५५ हजार ८४० जणांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.