
नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज रस्त्यापासून ते संसदेपर्यंत ऐकू येतोय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज संसदेत आणि कृषी कायद्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे संसदेत आज गोंधळाची चिन्हं दिसून येत आहेत. (अपडेट बातमी जाणून घेण्यासाठी वेबपेज रिफ्रेश करा) LIVE अपडेट : आभार प्रस्तावावर चर्चा सुरू राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव राज्यसभेत सादर करण्यात आला. यावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. आपचे तीन खासदार निलंबित सभापती व्यंकय्या नायडू यांनी शून्यकाळानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपच्या तीन खासदारांनी आपल्या जागेवर उभं राहून जोरदार घोषणाबाजी केली. 'कृषी कायदे रद्द करा' अशा घोषणा त्यांनी दिल्या. यानंतर शेतकरी मुद्यावरून राज्यसभेत गोंधळ घातल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांना - संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि एन डी गुप्ता यांना बुधवारी संपूर्ण दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत. शेतकरी मुद्यावर संसेदत १५ तास चर्चा होणार काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी १९ पक्षांच्यावतीने शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा करण्याचा प्रस्ताव संसदेसमोर मांडला. विरोधक आणि सरकार यांच्यात या मुद्यावर १५ तासांची चर्चा करण्यावर एकमत झालंय. राज्यसभेचं कामकाज स्थगित शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून विरोधकांकडून गोंधळ घालण्यात आल्यानंतर राज्यसभेचं कामकाज काही ९.४० पर्यंत स्थगित करण्यात आलं. सदनात मोबाईलचा वापर, सभापती नाराज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सदनात मोबाईल फोनच्या वापराला बंदी आहे. परंतु, काही सदस्या आपल्या मोबाईल फोनचा वापर सदनात रेकॉर्डिंग करण्यासाठी करतात. हे आचरण संसद शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे, असं म्हणत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिवसाच्या सुरुवातीलाच आपली नाराजी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यातील शेवटची बैठक १३ फेब्रुवारीला लोकसभेची १५ फेब्रुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील शेवटची बैठक शनिवारी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार, संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आला होता. राज्यसभेतही सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सदनाची बैठक १३ फेब्रुवारीला होईल, अशी घोषणा केली.